
Maharashtra Government Survey 2025 : महाराष्ट्र सरकारला वर्षभरात अनेक वादांना समोरे जावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर मंत्रीमंडळाची स्थापना झाली. महायुतीतील अनेकांना मंत्रीपद मिळाली. पण काही मंत्र्यांमुळे महायुती सरकार अडचणीत आली. विरोधकांनी या मंत्र्यांच्या वादामुळे महायुती सरकारला धारेवर धरलंय. त्यानंतर अनेक वादाला महायुती सरकार समोरे जावे लागले.
महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त झी 24 तास आणि ज्युबिलंट डेटा स्टुडिओ (JDS) यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचा राज्यव्यापी सर्व्हे केला. ज्यात कोणत्या वादामुळे महायुती सरकारच्या प्रतिमेवर जास्त परिणाम झाला हे विचारण्यात आलं.
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात घेण्यात आलेल्या महासर्व्हेमध्ये 89 हजार 812 जणांना प्रश्न विचारण्यात आला. या महाराष्ट्रातील जनतेला विचारण्यात आलं की, वर्षभरातील कुठल्या वादाचा परिणाम महायुती सरकारच्या प्रतिमेवर झाला? त्यात महाराष्ट्रात गाजलेले चार वाद म्हणजे धनंजय मुंडे – वाल्मिक कराड प्रकरण, पार्थ पवार – पुणे जमीन प्रकरण, संजय शिरसाट – सिडको प्रकरण आणि माणिकराव कोकाटे – रमी विवाद होते.
वाल्मिक कराड प्रकरण हे महाराष्ट्रातील राजकारणात खूप गाजले. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड यांचा मुख्य सूत्रधार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामाही देण्यात आला.
तर दुसरा वाद होता पार्थ पवार – पुणे जमीन प्रकरण जे झी 24 तासने केलेला मोठा गौप्यस्फोट होता. ज्यात पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातल्या 40 एकर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरण उघड केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. यात शीतल तेजवानीची मोठी भूमिका होती जी आज गजाआड आहे.
तिसरं प्रकरण होतं संजय शिरसाट – सिडको प्रकरण यात त्यांच्यावर सिडकोमधील 4,500 कोटी जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. तर चौथा वादा होता तो रमी व्हायरल व्हिडीओ, ज्यात राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधानभवनात रमी खेळताना आढळून आलेत. हा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर कोकाटे यांचे मंत्रीपद बदलण्यात आले.
दरम्यान झी 24 तास आणि ज्युबिलंट डेटा स्टुडिओ (JDS) च्या महासर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील जनतेला काय वाटतं. वर्षभरातील कुठल्या वादाचा परिणाम महायुती सरकारच्या प्रतिमेवर झाला? असं प्रश्न त्यांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी सांगितलं की, वाल्मिक कराड प्रकरणाचा 35 टक्के परिणाम सरकारच्या प्रतिमेवर झाला. त्यानंतर पुणे जमीन प्रकरणाचा 34 टक्के, सिडको प्रकरणाचा 13 टक्के तर रमी वादाचा परिणाम 18 टक्के झाला.

दरम्यान हा सर्व्हे पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष भेटी आणि घरघर फिरून करण्यात आला. हा सर्व्हे 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा आणि 48 तालुक्यात केला गेला. यात 22 हजार 654 जणांच्या वैयक्तिक मुलाखती घेतल्या. तर दुसरा टेलिया मोबाईल-आधारित AI व्हॉइस सर्व्हे करून मोबाईलद्वारे अत्याधुनिक, संवादात्मक AI-आधारित व्हॉइस सर्व्हेमध्ये 67 हजार 158 जणांना हा प्रश्न विचारण्यात आला.
महाराष्ट्रातील सर्व्हेची भौगोलिक व्याप्ती!
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र या विविध विभागांचे संतुलित प्रतिनिधित्व मिळावे यासाठी खालील 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा व 48 तालुके येथे सर्व्हे करण्यात आला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



