
Maharashtra weather News : मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असणाऱ्या पावसाचा जोर मंदावत असताना मध्येच वातावरणात होणाऱ्या बदलांमुळं हा पाऊस अडचणी वाढवताना दिसत आहे. हवामान विभागानं ही स्थिती पाहता सध्या सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा विरून जाताच राज्यातील पावसाचा जोर ओसरेल. तूर्तास हा पाऊसमारा सहन करण्यावाचून नागरिकांना दुसरा पर्याय नाही.
पुढील 24 तासांमध्ये राज्याच्यचा कोकण, मराठवाडा आणि घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यानच्या काळात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असेल आणि त्या कारणानं जगण्याचा वेग मंदावताना दिसणार आहे. उत्तर कोकणामध्ये मेघगर्जना आणि वादळी पावसाचं थैमान पाहायला मिळणार असल्यानं हवामान विभागानं या भागासाठी दक्षतेचा इशारा जारी केला आहे. तर, दक्षिण कोकणापासून थेट गोव्यापर्यंतसुद्धा पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यात पूरस्थिती…
राज्यात सर्वत्र पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळं मराठवाडयाला त्याचा सर्वाधिक तडाखा बसला असून, इथं पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, नांदेड शहराचा काही भाग जलमय झाला आहे. मराठवाड्यातील एकूण 2600 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला असून, नांदेड जिल्ह्यात 132 मि.मी. इतक्या रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद करण्यात आली.
Thunderstorms accompanied with lightning, with Heavy to Very Heavy rainfall and gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of North Konkan, in Ghat areas of North Madhya Maharashtra and Marathwada .
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 29, 2025
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू असून, घाटमाथ्यावर येत्या काळात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. प्रामुख्याने मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हाांमध्ये पावसाची संततधार सुरू असून अद्यापही निरभ्र आकाशाची पुसटशी चिन्हं कुठंही दिसत नाहीत.
मुंबईकरांपुढं पावसाचं विघ्न…
मुंबईत गणेशोत्सव मोठ्या दणक्यात सुरू झालेला असतानाच कोसळणाऱ्या पावसामुळं नागरिकांपुढं अनेक अडचणी उभ्या राहत आहेत. सततचं ढगाळ वातावरण आणि पावसाच्या जोरदार, तुरळक सरींनी नागरिकांची भंबेरी उडवली आहे. शहरासह उपनगरामध्ये ही परिस्थिती पुढील 24 तासांसाठी कायम राहणार असून, कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्यानंतर धीम्या गतीनं राज्यात पावसाचा जोर टप्प्याटप्प्यानं ओसरेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
FAQ
पाहा पावसाचा जोर आणि हवामान विभागाचा इशारा
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा मंदावला असला, तरी वातावरणातील बदलांमुळे पाऊस पुन्हा अडचणी वाढवत आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काय इशारा?
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात (मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) पावसाची संततधार सुरू आहे. घाटमाथ्यावर पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
मुंबईत गणेशोत्सव काळात पावसाचा अंदाज काय आहे?
मुंबईत पुढील 24 तासांत ढगाळ वातावरण आणि तुरळक मुसळधार सरींची शक्यता आहे. गणेशोत्सवात वाहतूक आणि मिरवणुकीत अडचणी येऊ शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगा.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.