
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या (Mumbai Weather) मुंबई शाखेसह केंद्रीय हवामान विभागानं अर्थात आयएमडीनंसुद्धा (IMD) महाराष्ट्रातून पाऊस इतक्यात माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण, कुठं निरभ्र आकाश, तर कुठं अगदी संततधारीपासून मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. अशा या परिस्थितीमध्ये पुढील चार ते पाच दिवस तरी राज्यातून पाऊस माघार घेणार नसल्याचं सिद्ध झालं आहे.
शुक्रवारपासून राज्यात पुन्हा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यापासून विदर्भ आणि कोकणापर्यंत पावसासाठी पूरक परिस्थिती निर्माण झाल्यानं या अस्मानी संकटात आणखी भर पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. पुढच्या 24 तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडसारख्या जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तर, मेघगर्जनेसह बरसणाऱ्या पाऊसधारा काही भागांमध्ये जनजीवनावर परिणाम करतील.
आधीच पुराला सामोऱ्या जाणाऱ्या मराठवाड्याच्या संकटातही येत्या काळात भर पडू शकते. कारण ठरत आहे ते म्हणजे इथं देण्यात आलेला पर्जन्यमानाचा इशारा. ताशी 30 ते 40 किमी वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांसह मराठवाड्यावर पुन्हा पावसाचा मारा होणार असल्यानं इथं नागरिकांसह बचावकार्यात व्यग्र असणाऱ्या यंत्रणांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
Thunderstorm accompanied with lightning, light to moderate rain with gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of Konkan-Goa and Madhya Maharashtra.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/nMpDmL5dwq— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 25, 2025
आठवड्याचा शेवट पावसानं?
राज्यातील हवामानाच्या पूर्वानुमानानुसार वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे, पालघर, कोकणातील जिल्हे, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा तडाखा बसेल. तर मुंबई, ठाणे भागात अतिमुसळधार पावसानंच या आठवड्याचा शेवट होणार असल्याला इशारा देण्यात आला आहे. कमी वेळात अदिक पावसाची शक्यता असल्याचा इशारा दिल्यानं नागरिकांनी गरज असल्यासच घराबाहेर पडा असा इशारा दिला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर ३० सप्टेंबरपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागानंही वर्तवला आहे. पुण्यात 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर 28 आणि 28 रोजी पावसाचा जोर वाढेल.
FAQ
महाराष्ट्रात पावसाचा सध्याचा आणि पुढील काळातील अंदाज काय आहे?
महाराष्ट्रात 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान पावसाची तीव्रता वाढेल. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस सुरू असून, काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोणत्या भागांत मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे?
कोकण (मुंबई, ठाणे, पालघरसह), मध्य महाराष्ट्र (घाट भाग), मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. विशेषतः 27-28 सप्टेंबरला कोकण आणि गोवा परिसरात अत्यंत जास्त पाऊस होईल.
IMD ने कोणत्या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केले आहेत?
IMD ने 33 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यात मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिकसह कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे यांचा समावेश आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.