digital products downloads

Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 17 वर्षांनी कोर्ट देणार निकाल; 2008 मध्ये नेमकं काय घडलं?

Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 17 वर्षांनी कोर्ट देणार निकाल; 2008 मध्ये नेमकं काय घडलं?

Malgaon Blast Case Verdict: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील शहरात झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटाच्या 17 वर्षांनंतर एनआयए विशेष न्यायालय गुरुवारी निकाल देणार आहे. विशेष न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी सर्व आरोपींना 31 जुलै रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. 29 सप्टेंबर 2008 रोजी रमजान महिन्याच्या बरोबरीने नवरात्रीच्या पूर्वसंध्येला झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि १०१ जण जखमी झाले होते. दरम्यान निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात वाढवण्यात आला आहे. 

मालेगावमध्ये पोलिसांचा बंदोबस्त

निकालाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस सज्ज झाली आहे. मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. निकालानंतर कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे मालेगाव मध्ये विशेष लक्ष ठेऊन आहे.

खटल्याला सामोरे गेलेले आरोपी कोण?

साध्वी प्रज्ञा सिंह चंद्रपाल सिंह ठाकूर उर्फ स्वामी पूर्णचेतानंद गिरी, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (निवृत्त), मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), समीर कुलकर्णी उर्फ चाणक्य समीर, अजय उर्फ राजा राहिरकर, सुधारावली पानवडेकर उर्फ राजा रहिरकर, दिवंगत पानसरे, दि. अमृतानंद देवतीर्थ आणि सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी उर्फ चाणक्य सुधाकर 

या प्रकरणात एकूण 12 आरोपी होते ज्यापैकी पाच जणांना निर्दोष सोडण्यात आले आहे. आरोपींवर भारतीय दंड संहिता, बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा आणि स्फोटके कायद्याअंतर्गत आरोप आहेत. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत असलेले आरोप मागे घेण्यात आले. विशेष एनआयए न्यायालयात खटला सुरू होण्यापूर्वीच पाच आरोपींना या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आले होते.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण काय आहे ?

तारीख – 29 सप्टेंबर 2008
वेळ – रात्री 9.35, नवरात्रीच्या पूर्वसंध्येला, रमजान महिन्यात
एकूण स्फोट – एक
ठिकाण – भिक्खू चौकातील एका हॉटेलजवळ
मृत्यू – 6 ठार, 101 जखमी
तपास – एटीएस आणि त्यानंतर एनआयए तपासात सामील

कोणावर कोणता आरोप?

– अभिनव भारत या हिंदू कट्टरपंथी संघटनेचा सहभाग
– साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर
– मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त) (पुणे रहिवासी, बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचा आणि शिकवण्याचा आरोप)
– समीर कुलकर्णी उर्फ चाणक्य समीर (पुणे येथील रहिवासी, बॉम्ब बनवण्यासाठी साहित्य मिळवण्यास मदत केली)
– अजय उर्फ राजा राहिरकर (अभिनव भारतचे पुणे येथील कोषाध्यक्ष)
– लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (मुख्य कट्टरपंथी, गटाचे प्रेरक, आरडीएक्स मिळवण्यास मदत केली)
– स्वामी अमृतानंद देवतीर्थ (स्वयंघोषित शंकराचार्य, जम्मू-काश्मीरचे रहिवासी, कट रचणारा)
– सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी उर्फ चाणक्य सुधाकर (ठाण्याचे रहिवासी, त्याच्याकडे शस्त्रे सापडली असा दावा एटीएसने केला होता, तो कटात सहभागी होता)

सुटलेले आरोपी

– शिवनारायण कलसांगरा
– श्यामलाल साहू
– प्रवीण टाकळकी उर्फ मुतालिक
– दोन वॉन्टेड आरोपी
– रामजी उर्फ रामचंद्र कलसांगरा (इंदूरचे रहिवासी, बॉम्ब पेरलेला)
– संदीप डांगे (इंदूरचे रहिवासी, बॉम्ब पेरलेला) (दोन्ही वॉन्टेड आरोपींचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याच्या दाव्याच्या आधारे नोंदवले गेले आहे , मात्र तसा आरोप सिद्ध झालेला नाही )

आतापर्यंत काय घडलं?

29 सप्टेंबर 2008 नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मालेगावातील भिक्कू चौकात झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आणि 100 जण जखमी.
4-5 नोव्हेंबर 2008 – लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित अटक
26-29 नोव्हेंबर 2008: 26/11 दहशतवादी हल्ले. मालेगाव प्रकरणाचे मुख्य तपासनीस असलेले विशेष आयजीपी हेमंत करकरे यांनी आपले प्राण गमावले
20 जानेवारी 2009 : भारतीय दंड संहिता, मकोका आणि बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा आणि स्फोटकांच्या पदार्थ कायदा ( substance act ) कलमांखाली 4,528 पानांचे आरोपपत्र दाखल
31 जुलै 2009 – मकोका आरोप 19 जुलै 2010 रोजी रद्द केले. मुंबई उच्च न्यायालयाने मकोका आरोप पुन्हा लावले
डिसेंबर 2010 – या प्रकरणात एनआयएचा सहभाग
23 मे 2013 – एनआयएने मुंबईच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले
24 जुलै 2015 – तत्कालीन विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी या प्रकरणात मवाळ भूमिका घेण्यासाठी दबाव आणल्याचा दावा केला केला.
15 एप्रिल 2016 – एनआयएने म्हटले की ते बाजू घेत नाही किंवा विरोध करत नाही
डिसेंबर 2016 – निलंबित पोलिस अधिकारी महिबूब मुजावर यांनी दावा केला की दोन फरार आरोपी रामजी उर्फ रामचंद्र कलसांगरा आणि संदीप डांगे आहेत त्यांची हत्या केली. पोलिसांनी एनआयएने चौकशीचे आश्वासन दिले
25 एप्रिल 2017 – कर्नल पुरोहित यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला , साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना जामीन मंजूर
21 ऑगस्ट 2017 – सर्वोच्च न्यायालयाने कर्नल पुरोहित यांना जामीन मंजूर केला
23 ऑगस्ट 2017 – कर्नल पुरोहित तळोजा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आले.
27 डिसेंबर 2017 – कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्याविरुद्धचा मकोका खटला रद्द
30 ऑक्टोबर 2018 – सात आरोपींविरुद्ध आरोप निश्चित
25 जुलै 2024 – एनआयए न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू
19 एप्रिल 2025 – खटल्याच्या न्यायालयाने निकाल जाहीर करण्यासाठी पूर्वी 8 मे तारीख निश्चित केली होती. मात्र आता 31 जुलै 2025 रोजी मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्ट निर्णय देणार आहे.

तपासात काय निष्पन्न झाले?

मुंबईपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या मालेगाव येथील मशिदीजवळ 29 सप्टेंबर 2008 रोजी मोटारसायकलचा स्फोट होऊन सहा जण ठार आणि 92 जण अधिक जखमी झाले होते. 30 सप्टेंबर 2008 ला हे प्रकरण राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) तपासासाठी वर्ग करण्यात आले होते. 20 जानेवारी 2009 मध्ये एकूण 14 जणांवर एटीएसकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात साध्वी, कर्नल पुरोहित आणि मेजर उपाध्याय हे कटाचे सूत्रधार तर स्फोटात वापरलेली दुचाकी साध्वीची असल्याचा आरोप होता. तसेच बॉम्बस्फोटासाठी आरडीएक्सचा वापर करण्यात आल्याचा आरोप होता. 11 एप्रिल 2011 ला प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग केला गेला. प्रकरणाच्या तपासाची सूत्रे घेतल्यानंतर एनआयएने 2016 मध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यात, साध्वी यांच्यासह श्याम साहू, प्रवीण टाकळकी आणि शिवनारायण कलसंग्रा यांच्याविरोधात पुरावे नसल्याचा दावा करून त्यांना दोषमुक्त करावे असे नमूद केले होते.

कोणाविरोधात खटला सुरू आहे?

याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि माजी भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्यावर खटला चालविण्यात आला. खटल्यात सरकारी वकिलांनी 323 साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवले असून त्यापैकी 34  साक्षीदार फितूर झाले. त्यातील काही साक्षीदारांनी एटीएसच्या तपासाबाबत गंभीर आरोप केले होते. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले होते. अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने 25 एप्रिल 2017  रोजी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना पाच लाख रुपयांचा जामीन मंजूर केला. त्यानंतर त्याच वर्षी 17 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांचा जामीन मंजूर केला होता.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp