digital products downloads

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा गणेशोत्सव

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा गणेशोत्सव

येत्या 26 जानेवारी 2026 रोजी भारत आपला 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे. राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या भव्य प्रजासत्ताक दिन संचलनासाठी संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हा ऐतिहासिक सोहळा भारताची लष्करी ताकद, सांस्कृतिक वैविध्य, तांत्रिक प्रगती आणि लोकशाही मूल्यांचे दर्शन घडवणारा असतो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणेच यंदाही देशभरात या राष्ट्रीय उत्सवाबाबत उत्सुकता आणि अभिमानाचे वातावरण आहे.

Add Zee News as a Preferred Source

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय सशस्त्र दलांचा—लष्कर, नौदल आणि हवाई दलाचा—भव्य मार्च-पास्ट पाहायला मिळणार आहे. शिस्त, समन्वय आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असलेले हे संचलन देशाच्या संरक्षण क्षमतेचे प्रभावी सादरीकरण करणार आहे. त्याचबरोबर लढाऊ विमानांच्या हवेतील थरारक कसरती, अत्याधुनिक संरक्षण उपकरणे आणि स्वदेशी लष्करी तंत्रज्ञानाचाही प्रत्यय प्रेक्षकांना येणार आहे.

प्रजासत्ताक दिन संचलनातील सर्वात आकर्षक आणि लोकप्रिय घटक म्हणजे विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून सादर करण्यात येणारे रंगीबेरंगी चित्ररथ. या चित्ररथांमधून भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, लोककला, पर्यटन, सामाजिक उपक्रम आणि विकासाची वाटचाल सजीव स्वरूपात मांडली जाते. प्रत्यक्ष कर्तव्य पथावर उपस्थित असलेले प्रेक्षक असोत किंवा दूरदर्शनवरून हा सोहळा पाहणारे कोट्यवधी नागरिक—चित्ररथ हे सर्वांसाठीच विशेष आकर्षण ठरतात.

(हे पण वाचा – Happy Republic Day 2026 wishes in Marathi : उत्सव तीन रंगाचा…प्रजासत्ताक दिनीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा, छाती अभिमानाने फुलेल) 

77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये एकूण 30 चित्ररथ सहभागी होणार आहेत. यामध्ये देशातील 17 राज्यांचे आणि केंद्र सरकारच्या 13 विविध मंत्रालये व विभागांचे चित्ररथ असतील. यंदाच्या संचलनाची अधिकृत थीम आहे— “स्वातंत्र्याचा मंत्र: वंदे मातरम, समृद्धीचा मंत्र: आत्मनिर्भर भारत.” चित्ररथांची निवड करण्यासाठी एक विशेष समिती कार्यरत असते. या समितीत कलाकार, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि पद्म पुरस्कार विजेते यांचा समावेश असतो. दरवर्षी आलटून-पालटून राज्यांना परेडमध्ये संधी दिली जाते, जेणेकरून देशातील प्रत्येक भागाचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय पातळीवर होऊ शकेल.

यंदाच्या परेडमध्ये सहभागी होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रासह आसाम, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, जम्मू-काश्मीर, मणिपूर, नागालँड, ओडिशा, पुदुच्चेरी, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश यांचा समावेश आहे. तसेच हवाई दल मुख्यालय, नौदल मुख्यालय, आयुष मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, गृह मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय आदी केंद्र सरकारच्या विभागांचे चित्ररथही या संचलनात सहभागी होणार आहेत.

यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ विशेष लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि राज्य महोत्सवाचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवावर हा चित्ररथ आधारित आहे. “गणेशोत्सव – आत्मनिर्भरतेचे प्रतीक” ही संकल्पना या चित्ररथातून मांडण्यात आली आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. काळानुरूप या उत्सवाचे स्वरूप विस्तारत गेले आणि आज गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक चळवळ बनला आहे.

महाराष्ट्राच्या चित्ररथावर अष्टविनायकांच्या प्रतिकृती, पारंपरिक ढोल-ताशांचे वादन आणि गणपती बाप्पाची भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे. या माध्यमातून गणेशोत्सवाशी जोडलेली लोककला, परंपरा आणि सामूहिक सहभाग अधोरेखित करण्यात आला आहे. गणेशोत्सवामुळे निर्माण होणारी आर्थिक साखळी हा या चित्ररथाचा मुख्य विषय आहे. मूर्तीकार, सजावट करणारे कारागीर, मंडप उभारणी, प्रकाश-ध्वनी व्यवस्था, वाहतूक, स्वच्छता आणि इतर सेवा क्षेत्रांमधून लाखो लोकांना रोजगार मिळतो.

(हे पण वाचा – Republic Day Speech : स्वातंत्र्य दिनासाठी मराठमोळे भाषण, 26 जानेवारी रोजी जिंकाल साऱ्यांचं मन) 

प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाल्याची आठवण करून देणारा दिवस आहे. लोकशाही, एकता आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असलेला हा दिवस भारताच्या यशस्वी प्रवासाची आणि भविष्यकालीन आकांक्षांची साक्ष देतो. यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा गणेशोत्सवावर आधारित चित्ररथ संस्कृती आणि आत्मनिर्भरतेचा संगम मांडत, देशभरातील नागरिकांसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.

77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी भारताने युरोपियन युनियनचे दोन प्रमुख नेते – उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो लुईस सँटोस दा कोस्टा यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी दिली आहे.

भारताने युरोपियन युनियनच्या नेत्यांना प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे का बनवले?

उत्तर:युरोपियन युनियन एका देशाप्रमाणे नाही तर २७ राष्ट्रांच्या गटाप्रमाणे काम करते. आपल्या दोन प्रमुख नेत्यांना आमंत्रित करून, भारताने संपूर्ण युरोपियन युनियनला एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे.

उर्सुला वॉन डेर लेयन या युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा आहेत, जे युरोपियन युनियनचे कार्यकारी शाखा आहे, जे व्यापार करारांवर वाटाघाटी करते आणि नियमांची अंमलबजावणी करते.

दरम्यान, अँटोनियो लुईस सँटोस दा कोस्टा हे युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष आहेत, जे सर्व 27 देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे प्रतिनिधित्व करते आणि धोरणात्मक दिशा निश्चित करते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp