digital products downloads

Weather News : एक वादळ गेलं, दुसरं आलं; देशात पावसाचा तर राज्यात… हवामान विभागाच्या इशाऱ्यानं वाढवली चिंता

Weather News : एक वादळ गेलं, दुसरं आलं; देशात पावसाचा तर राज्यात… हवामान विभागाच्या इशाऱ्यानं वाढवली चिंता

Maharashtra Weather News : भारतात बहुतांश भागांतील किमान आणि कमाल तापमानात गेल्या काही काळापासून चढ- उतार झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दिल्ली एनसीआरपासून बिहार, पंजाब, हिमाचल, काश्मीरपर्यंत हे चित्र कायम असून, पुढील काही दिवसांसाठी हा अंदाज कायम असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. इथं महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरणाचा माहोल असून, आता मात्र ही स्थिती बदलणार असून, राज्यातील किमान तापमानात चढ- उतार अपेक्षित असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

कोकण किनारपट्टीसह मुंबई मुख्य शहर आणि उपनगरांमध्येसुद्धा हवेत आर्द्रता वाढली असून, विदर्भ, मराठवाड्यात मात्र तापमानात काही अंशांची घट नोंदवली जाऊ शकते असा अंदाज प्राथमिक निरीक्षणानंतर हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात पहाटे आणि रात्री उशिरा जाणवणारा गारठा वगळता दिवसभर सूर्यकिरणांमुळं होणारा उष्णतेचा मारा अनेकांनाच सोसावा लागत आहे. हे चित्र स्थिर राहणार असून, पुढील 24 तासांमध्ये कमाल तापमानाच फार बदल होणार नसून पाच दिवसांसाठीसुद्धा ही स्थिती कायम राहू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट वगळता फारसे बदल पुढील 24 तासांमध्ये अपेक्षित नसून, मुंबई शहरात आकाश निरभ्र राहणार असून, तापमान 33 अंश ते 23 अंशांदरम्यान राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील सातारा, कोल्हापूर, पुणे या भागातील घाट क्षेत्रामध्ये काही ठिकाणी धुक्याची चादर असेल तर, दिवस मावळतीचा गेल्यानंतर गिरीस्थानांवर तापमानात घट नोंदवली जाणार आहे. शहरी भागांमध्ये मात्र उष्मा कायम असल्या कारणानं नागरिकांना हवामानाच्या अनपेक्षित स्थितीचा अनुभव घेता येऊ शकतो. 

 

एका वादळानंतर दुसऱ्या वादळाचा धोका वाढला… 

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका धीम्या गतीनं वाढण्यास सुरुवात होणार असून, दक्षिण पश्चिम बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या किनारपट्टी भागामध्ये तयार होणाऱ्या तीव्र स्वरुपातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पुढील काही तासांमध्ये चक्राकार वाऱ्यांची ही स्थिती वादळाचं रुप धारण करणार असून त्याचा थेट परिणाम तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी आणि केरळमध्ये दिसणार आहे. 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान हे परिणाम पाहायला मिळणार असून, देशाच्या दक्षिण आणि पश्चिम किनारपट्टी भागावर पावसाचं थैमान पाहायला मिळणार आहे. वादळी वारे या भागात वाहणार असल्यानं यंत्रणांनी किनारपट्टी भागात असणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp