
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे. कधी कडाक्याचं ऊन्ह तर कुठे पावसाच्या जोरदार सरी. हवामान विभागाने बर्फाच्या गारा देखील कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
कसं असेल तापमान?
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये निरभ्र आकाश राहील. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. तर पुणे शहरामध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे असेल. तर कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह महाराष्ट्रातील काही शहरांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर एका दिवसानंतर, IMD ने उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती हळूहळू कमी होऊन तापमान हळूहळू कमी होण्याचा अंदाज वर्तवला.
15 मार्च रोजी मुंबई शहराचे पहिले 40 अंश तापमान नोंदवले गेले. हवामान विभागाने ठाणे, पालघर, रायगड (नवी मुंबई) आणि रत्नागिरीला इशारा जारी केला. “गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या काही भागात तापमानात मोठी वाढ झाली आहे. तापमान कमी होत आहे आणि राज्याच्या काही भागात दमट आणि कोरडे वातावरण दिसून येईल,” असे IMD चे संचालक सुनील कांबळे म्हणाले.
विदर्भात तीन जिल्ह्यांसाठी High Alert
हवामान खात्याने विदर्भातील तीन जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा तापमानाचा इशारा दिलाय. अकोला, यवतमाळ, चंद्रपूर या तीन जिल्ह्यांसाठी आगामी 24 तासाचा अतिउष्ण तापमान इशारा देण्यात आलाय. गेल्या तीन दिवसात चंद्रपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाने मोठी उसळीं घेतली आहे. होळी नंतर तापमानात झालेली मोठी वाढ नागरिकांसाठी चिंताजनक ठरली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात थंडी जाणवत होती. मात्र त्यानंतर अचानक पारा उंचावला आणि आता मागील 10 दिवसांच्या सरासरीपेक्षा 3 ते 4 अंश सेल्सियस अधिक तापमानाची नोंद विदर्भातील सर्वच जिल्ह्यात झाली आहे. मार्चच्या मध्यात तापमान 42 अंश सेल्सियसपर्यंत धडकल्याने आगामी काळात पारा चढा राहील असा अंदाज वर्तविला जात आहे
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.