
परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि वादळामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. लामकाना, अंजडोह, हातमाली, नायगाव्हाण, सेलूद, चारठा, दरेगाव, कोनेवाडी, पिंपळखुटा, औरंगपूर, सय्यदपूर या भागात मोसंबी, डाळिंब, पपई, पेरू, आंबा
.
प्रतिनिधी |करमाड ढवळापुरी (ता. छत्रपती संभाजीनगर) परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार विदळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने फळबागा पाठोपाठ घराचे व विहीरेचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पहाणी करुन पंचनामे करण्याचे आदेश आ.अनुराधा चव्हाण यांनी दिले आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुधड, भांबर्डा, जयपूर, फेरण जळगाव, ढवळापुरी,शेवगा, गाढे जळगाव व परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.वादळी वाऱ्यामुळे मोसंबी, डाळिंब, आंबा आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. ढवळापुरी येथील किसन पुगंळे यांच्या घरावर झाड कोसळून बाथरूम पुर्णपणे दबले आहे. विठ्ठल पुगंळे यांची विहीर व परमेश्वर पुगंळे यांच्या घराची भिंत कोसळली आहे. खरीप हंगामाचे दिवस डोक्यावर आले असून खरिप पेरणी साठी शेतकऱ्यांनी जुळवा जुळव करीत असताना वादळी वाऱ्यासह पावसाने परिसरात हजेरी लावल्याने फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानीची मंगळवारी आ.अनुराचा चव्हाण यांनी पाहणी करून फळबागाचे तात्काळ पंचनामे करून शासनाला सादर करण्याचे आदेश दिले आहे. या वेळी शरद पुगंळे, परमेश्वर पुगंळे, विष्णू पुगंळे, विठ्ठल पुगंळे, सरपंच युसुफ पटेल, तंटामुक्तीचे अध्यक्ष गुलाम पटेल ग्रामसेवक काळे, मंडळ अधिकारी शर्मा, सुभाष शेळके आदी हजर होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.