digital products downloads

तब्बल वीस वर्षानंतर टँकरच्या अंधःकारातून बाहेर: जलजीवनच्या विहीरीवरून अंधारवाडी गावात पाणी पुरवठा – Hingoli News

तब्बल वीस वर्षानंतर टँकरच्या अंधःकारातून बाहेर:  जलजीवनच्या विहीरीवरून अंधारवाडी गावात पाणी पुरवठा – Hingoli News


सीईओ अंजली रमेश यांच्या पुुढाकारातून गावात मुबलक पाणी

दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचे चटके सोसणाऱ्या हिंगोली शहरालगतच्या अंधारवाडी गावात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या पुढाकारातून गावातील टँकरचा अंधःकार दूर झाला असून जलजीवनच्या उ

.

हिंगोली शहरापासून काही अंतरावरच असलेले अंधारवाडी गाव. या गावाची लोकसंख्या सुमारे 3500 एवढी आहे. गावात दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापासूनच टंचाईची झळ सोसावी लागते. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. विशेष म्हणजे गावातील विहीरींमध्ये टँकरचे पाणी सोडण्यासाठी टँकर गावात जात नाही. त्यामुळे गावाबाहेरच टँकर उभे करून सुमारे 50 पाईपद्वारे पाणी विहीरीत सोडावे लागत होते. दररोज दोन टँकरने संपूर्ण उन्हाळा टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. त्यातून शासनाचा लाखो रुपयांचा खर्च होत होता. दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना गावासाठी मंजूर झाली. त्यासाठी गावापासून सुमारे साडेतीन ते चार किलो मिटर अंतरावर असलेल्या पारोळा तलावामध्ये उद्‌भव विहीर घेतली.

या विहीरीला मुबलक पाणीही लागले आहे. मात्र गावांतर्गत जलवाहिन्या व इतर कामे झाली नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांना यावर्षीही टँकरवर तहान भागवावी लागणार होती. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी जिल्ह्यातील भौतिकदृष्टया पूर्ण झालेल्या कामांची माहिती घेतली. यामध्ये अंधारवाडीमध्ये बहूतांश काम पूर्ण झाल्याचे दिसून आले. तर गावापर्यंत जलवाहिनी टाकल्याचेही दिसून आले. त्यानंतर त्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल सोळुंके यांच्याशी चर्चा करून पारोळा तलावातील विहीरीवरून गावातील विहीरीत पाणी सोडण्याबाबत सुचना दिल्या. त्यावरून कार्यकारी अभियंता सोळंुके, अभियंता संदेश देशमुख, ग्रामसेवक राजेश किलचे, डोरले पाटील, कंत्राटदार यांनी पाहणी केली. त्यानंतर चार किलो मिटरवरून अंथरलेल्या जलवाहिन्यांद्वारे गावातील विहीरीत पाणी सोडले.

सध्या गावातील विहीरी पाण्याने तुडुंब भरू लागल्या आहेत. त्यामुळे गावकऱ्यांचा भर उन्हात पाणी भरण्याचा त्रासही कमी झाला असून गाव टँकरमुक्त झाले आहेत. त्यातून शासनाचा टँकरवरील खर्चात बचत झाली आहे. चौकटीचा मजकूर पुढील काही दिवसांतच नळ जोडणी मिळणार गावामध्ये मुबलक पाणी उपलब्ध झाले असून दोन विहीरी तुंडुंब भरल्या जात आहेत. त्यानंतर आता पुढील काही दिवसांतच घरोघरी नळ जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे गावाचा पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी मिटणार आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp