Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education
साताऱ्यातील करंजे येथील आंदेकर चौकात गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वृषभ जाधव याला कोयत्याने मारहाण करून खून केल्या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांत ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.याची फिर्याद मृत वृषभचा भाऊ श्रेयश दशरथ जाधव(वय २०,राहणार रविवार पेठ,सातारा) याने दिली असून यामध्ये भाजप नगरसेवकावर गुन...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभी उद्धव ठाकरेंनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, राज ठाकरेंसोबत आपण ‘वादळात’ खेळून मोठे झाल्याचे आवर्जून सांगितले. वडिलांशी असलेले नाते आणि आईने (मा) घर सावरण्यात दिलेल्या योगदानाचा गौरव करतानाच त्यांनी आपल्या घराण्याबद...
शिवसेना संस्थापक पक्षप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने श्री षण्मुखानंद सभागृहात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा एकाच मंचावर आले आहेत. विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा द...
बदलापूरच्या घटनेमुळे राज्याच्या अब्रुची लक्तरे पुन्हा वेशीवर टांगली गेली आहे. राज्यकर्त्यांमध्ये गुन्हेगारांवर कारवाई करण्याची धमकच उरली नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला लाभलेले सर्वात निष्क्रीय व बेजबाबदार मुख्यमंत्री आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी केली आह...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमधील राजकीय घडामोडी, हिंदुत्वावरची भूमिका, बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आणि बदलापूरमधील बालिकेवरील अत्याचार प्रकरण या तिन्ही मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतील सध्याच्या वादावर भाष्य करताना त्यांनी स्पष्...
मागील दोन महिन्यांपासून शहरात निवडणुकीची धामधूम सुरू होती. ती संपताच महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने कबाडीपुरा-रऊफ कॉलनी परिसरात कारवाई केली. कर्करोग रुग्णालयाच्या मागील शासकीय जागेवरील २२ अनधिकृत घरे हटवली. ही घरे कच्ची व पक्क्या स्वरूपातील होती. सर्व घरे जमीनदोस्त केली. या रहिवाशांना यापूर्वी...
जानोरी गावातील शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणावर मात करत फुलशेतीमध्ये जागतिक दर्जाचे यश संपादन केले आहे. येथील शेतकरी सुमारे २०० एकर शेतीवर प्रामुख्याने गुलाब, जर्बेरा, कार्नेशन आणि ग्लॅडिओलस यांसारख्या विदेशी फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. ‘पॉलिहाऊस’ तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादित क...
बदलापूर पश्चिम परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या एका अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर स्कूल व्हॅनच्या चालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या अशाच एका घटनेच्या जखमा ताज्या असतानाच, या नवीन प्रकरणाने...
शाळा सुरक्षा कृती कार्यक्रमांतर्गत गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव विद्यामंदिर आणि शिवणगाव येथील शिवचंद्रजी लढ्ढा माध्यमिक शाळेत आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने ही कार्यशाळा सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात आली. या का...
मराठी शाळा टिकल्या तरच महाराष्ट्र राज्य मराठी परीक्षा मंडळ टिकेल आणि पर्यायाने मराठी संस्कृती कायम राहील, असे प्रतिपादन अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संदीप संगवे यांनी केले. मराठी विद्यार्थी स्पर्धेत टिकण्यासाठी खाजगी अनुदानित मराठी शाळांनी आपला दर्जा टिकवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले....
‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ च्या तिसऱ्या टप्प्यात चीनच्या ‘ली निंग स्टार’ संघाच्या कॅमेरून निकोलस स्कॉटने बाजी मारली. पश्चिम घाटाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या या आव्हानात्मक १३७ किलोमीटरच्या टप्प्यात त्याने ३ तास ४ मिनिटे आणि १३ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. या टप्प्यात ल्यूक मुडग्वेन...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांचे विचार, कार्य आणि राष्ट्रवादावरील त्यांची स्पष्ट भूमिका आजही मार्गदर्शक असल्याचे नमूद केले. डॉ. गोऱ्हे यांनी...
मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणावरून निर्माण झालेल्या वादावर आता सत्ताधाऱ्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. शिवसेना उबठा गटाने केलेल्या आरोपांना उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ठाकरे गटाचे आरोप नियमबाह्य आणि दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं आहे. आरक्षण प्रक्रिया ही पूर्णपणे कायद्याच...
पुण्यातील मुंढवा भागात प्रेमसंबंधातून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रवीण धनंजय माने (वय 24, रा. श्रीमाननगर, शेवाळवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्या तरु...
खादगाव दोहरी तांडा गारखेडा शिवारातून ४० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या तब्बल ट्रकभर वीज पंपांच्या वायरिंगची चोरी झाली आहे. १५ ते २० चोरट्यांची सशस्त्र टोळी असून ऐन हंगामात वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जामनेर तालुक्यात वीज पंप व त्यासाठी लागणाऱ्या वायरची चोरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे....
पालघर जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, आदिवासींनी जल, जमीन आणि जंगल या प्रश्नांसाठी साठ किलोमीटरचा लाँग मार्च काढला. सुमारे ४० हजार लोकांनी त्यात भाग घेतला. दोन दिवसांच्या आक्रमक आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाने सहा तास आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर त्यातून काही प्रश्न मार्गी लागले, तर काही प्रश्न...
सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस बुधवारी होता. सकाळपासून इच्छूकांनी शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केल्याने अर्ज स्वीकृती केंद्रावर गर्दी झाली होती. सातारा जिह्यात भाजपाने तब्बल 60 ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरले असून पंचायत समितीसाठी 118 ठिकाणी अर्ज भरले आ...
पुणे शहरात पद्मावतीतील तळजाई वसाहतीत टोळक्याने २३ वाहनांची तोडफोड केली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मावतीतील तळजाई वसाहत...
पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूर परिसरात धडक कारवाई करत तब्बल 25 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. यातील मुख्य आरोपीने अमली पदार्थांचा पुरवठा अहिल्यानगरमधील एका पोलिस कर्मचाऱ्यानेच केल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. या गंभीर घटनेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रव...
पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि निसर्गसंपन्न वारशाचे जागतिक पातळीवर दर्शन घडवणाऱ्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचा आज उत्साहात प्रारंभ झाला. कॅम्प येथील लेडीज क्लब परिसरातून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि सामा...
पुण्यात रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने एका तरुणाची 14 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील दोन व्यक्तींविरुद्ध लक्ष्मीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सागर दिगंबर पाटील (वय 35) आणि स्वप्नील मुरलीधर गायकवाड (वय 33, दोघे रा. तळई, ता. एरंडोल, जि....
मुंबई महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीनंतर माहीम विधानसभा परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वॉर्ड क्रमांक 194 मधून शिंदे गटाच्या शिवसेनेकडून लढलेले समाधान सरवणकर यांनी आपल्या पराभवामागे थेट भाजपच्या असहकाराची कारणमीमांसा केली आहे. निवडणूक लढत केवळ विरोधकांशी नव्हती, तर आपल्या प्रभागातच एक मोठ...
घाटनांद्रा येथील इंद्रगढी प्राथमिक शाळेत मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार (दि. २०) रोजी महिला पालकांच्या उपस्थितीत हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी विविध प्रकारच्या स्पर्धांनी हळदी-कुं . शाळेचे मुख्याध्यापक भरत सुपेकर यांच्या मार्गदर्शनाख...
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्रित रणनीती आखली असून, मतदारसंघाच्या सोयीनुसार ‘घड्याळ’ किंवा ‘तुतारी’ या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या जागावाटप आणि चिन्हांच्या तडजोडीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर इंदापूर...
राज्य सरकारकडून वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांतील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात असून, आता या योजनेच्या निकषांची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात येत आहे. प्रशासनाकडून सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्याचे वारंवार आवा...
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि भारतीय क्रीडा विश्वात नवा इतिहास घडवणारी ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा मंगळवारी सुरू झाली. देशातील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय ‘ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथून या स...
छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘कीज हॉटेल’ येथे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून, या बैठकीनंतर महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी महानगरपालिका निवडणुकीत तब्बल 12 बैठका होऊनही शेवटच्या क्षणी यु...
पुणे महानगरपालिका निवडणुकीतील ईव्हीएम (EVM) आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी नगरसेवक सतीश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत या प्रक्रियेत धक्कादायक अनियमितता झाल्याचा आरोप केला. लोकशाही जनतेच्या विश्वासावर आधारित असते, मात्र या घटनांमुळे नागरिकांचा विश्...
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असून त्यासाठीचे आवश्यक संख्याबळ जमवल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज स्पष्ट केले. काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात ही भाजप नेत्यांची विधान म्हणजे हवेतील पतंगबाजी असल्याचा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून चं...
प्रतिनिधी | अमरावती शाळेतील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पहाता मुलांच्या कलागुणांना समोर आणून त्यांना घडवण्याची एक संधी म्हणून बघायला हवे, असे प्रतिपादन कांचन मुरके यांनी केले. स्मॉल वंडर्स कॉन्व्हेंटच्या वतीने आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रम घेण्यात आला. स्नेह संमेलन कार्यक्रमात ले...
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये एमआयएमचे ३३ नगरसेवक निवडून आले. पक्षाला मिळालेल्या या भरघोस यशाचा आनंद विजयी उमेदवार तसेच कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर चक्क पैसे उधळून व्यक्त केला. एमआयएमच्या विजयामुळे शहरात विविध ठिकाणी विजयाचा जल्लोष करण्यासाठी कार्यक्रमांच...
वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने भारतीय जनता पक्षाचा पराभव करत दणदणीत विजय मिळवल्यानंतर, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार मिलिंद नार्वेकर यांनी हितेंद्र ठाकूर आणि भाई ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीत भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात थे...
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लक्षात घेता, अमरावती जिल्हा परिषद प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपये, तर मुख्यालयातील दालनांच्या दुरुस्तीसाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मार्च २०२२ मध्ये तत्कालीन...
‘महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो. ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. एक एकोसिस्टम तयार केली आहे. त्याआधारे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक...
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आज पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आलेल्या सुमारे 50,000 लोकांचा एक अतिभव्य पायी मोर्चा काढला. हा मोर्चा डहाणू तालुक्यातील चारोटी येथून सुरू झाला असून, रात्री मनोर येथे मुक्काम करेल आणि उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करेल. जोपर्यंत सरकारच्या वतीने निश्चित क...
देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे महाशिवरात्र उत्सव व रथोत्सवाच्या वेळी भाविकांची गैरसोय होणार नाही याकडे संस्थानने लक्ष देऊन त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आमदार संतोष बांगर यांनी सोमवारी ता. १९ केल्या आहेत. औंढा नागनाथ येथील भक्तनिवास येथे महाशिवरात्री उत्सवाच्या पूर्वतयारीची बैठक झाली....
राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणासंदर्भात महत्त्वाची हालचाल सुरू झाली असून, या विषयावर तोडगा काढण्यासाठी आणि आरक्षण ठरवण्यासाठी नगरविकास विभागाकडून उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने याबाबत अधिकृत पत्रक जारी केले असून, ही बैठक गुरुवार, 23 जानेव...
प्रतिनिधी | अकोला अकोट तालुक्यातील उमरा महसूल मंडळातील पिंपरी खु. येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तूर पिकाचा पीक कापणी प्रयोग राबवण्यात आला. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तूर पिकाचा पीक कापणी प्रयोग राबवण्यात आला. या पीक कापणी प्रयोगावेळी नाबार्ड विभागाचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्रीराम वाघमारे, तलाठी...
महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे नेते कलीम कुरेशी आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यात झालेला राडा या निवडणुकीतील सर्वात मोठा ‘टर्निंग पॉईंट’ ठरला आहे. या वादाचे पडसाद मतदानात उमटल्याने त्याचा थेट फटका काँग्रेसला बसला, तर एमआयएमला मोठा फायदा झाला. निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्यानंतर इम्तियाज जलील य...
वसमत ते परभणी मार्गावर वसमत शहरापासून काही अंतरावर भरधाव वेगाने धावणारी कार कालव्यात पडल्याने रविवारी तारीख 18 रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास मोठा अपघात झाला. दैव बलवत्तर असल्याने कार मधील दोघेही बचावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील खांडेगाव येथील शिवराज रामराव तिमेवार (३०) हे त्य...
अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार २२५ शेतकऱ्यांना लाभ पोहोचवणारे १२ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या प्रकल्पांमधून एकूण ५९ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. या मालिकेतील बारावा प्रकल्प नुकताच सुरू झाला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य झाले आहे. चांदूर बाजार तालुक्यातील जवर्डी येथ...
मुंबईचा महापौर कोणाचा होणार? यावरून कमालीची गुप्तता आणि रस्सीखेच पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील ‘ताज लँडस् एन्ड’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. आज त्यांनी या नगरसेवकांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी शि...
मुंबईच्या महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, ‘डॉन’ अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी यांना मात्र या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निकालानंतर त्यांचे पती आणि प्रसिद्ध अभिनेता अक्षय वाघमारे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत योगिता यांच्या जिद्दीचे व त्या...
मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत अखेर तांत्रिक बिघाडांमुळे रखडलेले दोन निकाल ‘पाडू’ (PADU – Printing Auxiliary Display Unit) या यंत्राच्या सहाय्याने निकाली काढण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी या यं . मतदान यंत्रात (EVM) तांत्रिक बिघा...
महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी राजकीय वादाच्या घटना समोर येत आहेत. नाशिकमध्ये विजयाचा जल्लोष करताना एका भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला करून आग लावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरीकडे, नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या एकमेव नगरसेवि...
मुंबई भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आणि दक्षिण मुंबईतील प्रभावशाली नेते राज के. पुरोहित (७१) यांचे आज मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू, अनुभवी आणि सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. राज...
उत्तर प्रदेशातील धर्मांतर रॅकेटचा सूत्रधार व स्वयंघोषित धर्मगुरू छांगुरबाबाच्या ‘धर्मांतर सिंडिकेट’ चे धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचले असून राजस्थान, लखनऊ, बलरामपूर व पुण्यानंतर यूपी एटीएसने नागपूर एटीएस व स्थानिक पोलिसांच्या मदतीने जरीपटका भागातून इरद . पोलिसांनी सांगितले की, आशी नगर येथील गवसीया मशीद पर...
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही, तोच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आज आपल्या ४० स्टार प्रचारकांची जंगी यादी जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक...
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे. जिल्ह्यात अजितदादांनी सर्वच प्रमुख विकासकामे मार्गी लावली आहेत. पालककमंत्री असताना तसेच आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांचे सातत्याने जिल्ह्यावर लक्ष राहिले आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून हा जिल्हा राष्ट्रवादीच्या पाठिशी आहे. पवार...
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला पत्कराव्या लागलेल्या दारुण पराभवानंतर आता पक्षांतर्गत कलह उफाळून आला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार भाई जगताप यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, सार्वजनिकरित्या पक्षाविरोधी भू...