digital products downloads

अजून लग्न नाही, पण नवरा- नवरीचा एकत्र संसार सुरू: प्रकाश आंबेडकरांचा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य आघाडीला टोला – Mumbai News

अजून लग्न नाही, पण नवरा- नवरीचा एकत्र संसार सुरू:  प्रकाश आंबेडकरांचा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य आघाडीला टोला – Mumbai News


वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य मनोमिलनाचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. या दोन्ही पक्षांचे लग्न अजून झाले नाही. परंतु तत्पूर्वीच नवरा – नवरी एकत्र संसार करायला लागलेत, असे ते म्हणालेत.

.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट भविष्यात एकत्र आल्यास आश्चर्य वाटू नये असे मत व्यक्त केले होते. तसेच यासंबंधीचा निर्णय सुप्रिया सुळे यांना घ्यायचा असल्याचेही म्हणाले होते. त्यानंतर स्वतः सुळे यांनीही यासंबंधीचा कोणताही निर्णय पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष लवकरच राजकारणात एकत्र येतील असा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीला उपरोक्त टोला हाणला आहे.

शरद पवारांचा पक्ष कुठेच नाही

सध्या साखर कारखान्यांच्या निवडणुका सुरू आहेत. पण त्यात कुठेही शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवत नाही. अजित पवार हेच या निवडणुका पूर्णपणे हाताळत आहेत. अजून लग्नही झाले नाही, परंतु नवरा – नवरी एकत्र संसार करायला लागलेत, असे प्रकाश आंबेडकर शनिवारी एका पोस्टद्वारे शरद पवार व अजित पवारांवर शरसंधान साधताना म्हणालेत.

लवकर मनोमिलन व्हावे – भुजबळ

उल्लेखनीय बाब म्हणजे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे लवकरात लवकर मनोमिलन होण्याची गरज व्यक्त केली होती. शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी आशेचा किरण दाखवला आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल. पण हे मनोमिलन लवकरात लवकर झाले पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर माझी मध्यस्थी करण्याची तयारी आहे. पण अजित पवार हे पवार साहेबांच्याच घरात वाढलेत. त्यामुळे त्यांचे मनोमिलन घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही, असे ते म्हणाले होते.

युद्धात एकही देश आपल्या बाजूने उभा राहिला नाही

दुसरीकडे, प्रकाश आंबेडकरांनी केंद्राने परदेशात पाठवलेल्या पाकविरोधातील खासदारांच्या शिष्टमंडळावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी सगळ्या देशांना जाऊन आले, पण युद्धामध्ये एकही देश आपल्या बाजूने उभा राहिला नाही. जिथे पंतप्रधान मोदी प्रभाव पाडू शकले नाही तिथे खासदारांचे प्रतिनिधी मंडळ काय करेल, चर्चा करतील पण हे शक्ती आणि संसाधन वाया घालवण्याचे काम आहे, असे ते म्हणाले होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp