
उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय हाडवैर सर्वश्रूत आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे हे दोघेही एकमेकांपुढे येण्याचे टाळतात. पण आज ते अर्थसंकल्पाच्या निमित्ताने एकमेकांपुढे आले… यावेळी मुख्यमंत्री द
.
त्याचे झाले असे की, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर विधिमंडळाचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत लगबगीने सभागृहाबाहेर पडले. त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ही सभागृहातून निघाले होते. त्यामुळे या सर्व नेत्यांची विधिमंडळाच्या गॅलरीत भेट झाली. यावेळी फडणवीस यांनी ठाकरेंना पाहताच त्यांना हात जोडत नमस्कार केला. तसेच हस्तांदोलनही केले. पण एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी फडणवीसांना उद्देशून मिश्किल टिप्पणी केली. काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाही? असे ते फडणवीसांना म्हणाले. तसेच अजित पवारांना दादा हा तुमचा अर्थसंकल्प नाही असे म्हणाले. त्यावर अजित पवारांनी त्यांना हसून दाद दिली. हे सर्व बोलणे होताना एकनाथ शिंदे तिथेच काही क्षण घुटमळत होते. पण त्यांनी व ठाकरेंनी एकमेकांकडे पाहिलेही नाही. त्यानंतर शिंदे तसेच पुढे पत्रकार परिषदेच्या दिशेने निघून गेले. यामुळे या दोन्ही नेत्यांमधील विसंवाद प्रकर्षाने पुन्हा एकदा दिसून आला.
नीलम गोऱ्हे यांनी मर्सिडीजवरून केली होती टीका
उल्लेखनीय बाब म्हणजे शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनावेळी मर्सिडीजच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी हाच धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मर्सिडीजचे भाव वाढवण्यासंबंधीचा प्रश्न केला होता.
10 हजार वर्षांतील बोगस अर्थसंकल्प
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर भाष्य करताना हा 10 हजार वर्षांतील सर्वात बोगस अर्थसंकल्प असल्याची टीका केली. दरवर्षीसारखा यंदाही अर्थसंकल्प सादर झाला. हा अर्थसंकल्प पाहून मला आचार्य अत्रे यांची आठवण झाली. आज अत्रे असते तर असा बोगस अर्थसंकल्प मी मागच्या 10 हजार वर्षांत मी पाहिला नाही असे म्हणाले असते. मी सभागृहात बसून हा अर्थसंकल्प समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा सार काढायचा झाला तर मी असे म्हणेन की, उद्याचा सूर्य उगवणार आहे. सर्वांना प्रकाश मिळणार आहे. आणि त्यातून व्हिटॅमिन बी सुद्धा तुम्हाला मिळेल, अशा आशयाचा हा अर्थसंकल्प आहे, असे ठाकरे म्हणालेत.
हे ही वाचा…
महाराष्ट्रात 5 वर्षांत 71 लाख रोजगार:नव्या औद्योगिक धोरणातून 50 लाख रोजगार तयार होणार; अर्थसंकल्पातून अजित पवारांचा आशावाद
मुंबई – आगामी काळात महाराष्ट्रात 71 लाख 7 हजार 500 इतकी रोजगार निर्मिती होईल, असा आशावाद सोमवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पातून व्यक्त केला. दावोस गुंतवणुकीतून सुमारे 16 लाख, महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक 2025 मधून 50 लाख, तर लॉजिस्टिक धोरणातून 5 लाख आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या स्टील हबमधून 7 हजार 500 रोजगार निर्मिती होईल, असे पवार म्हणाले. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.