
शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभानिमित्त श्रावण सोमवारी जलदिंडी काढण्यात आली. भरपावसात महिलांनी एकत्र येत घराघरांतून भरून आणलेले लोटाभर पाणी मोठ्या कळसात अर्पण केले. ही जलदिंडी सिद्धेश्वर महादेव मंदिरापासून सुरू होऊन तीर्थक्षेत्र नागेश्वर मंदि
.
वरणगाव शहराची दीर्घकाळ रखडलेली पाणीपुरवठा योजना आता कार्यान्वित झाली आहे. यामुळे शहरात १७ दिवसांनी मिळणारे पिण्याचे पाणी आता पाच दिवसांआड उपलब्ध होत आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी शहरात जलदिंडी काढण्यात आली. महिलांनी घराबाहेर येत रांगोळ्या काढल्या, गुढ्या उभारल्या. फुलांची उधळण करत जलदिंडीचे स्वागत केले.
या जलदिंडीची सुरुवात सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित बागुल यांच्या हस्ते करण्यात आली. माजी नगराध्यक्ष सुनील काळे उपस्थित होते. नंतर शहरातील प्रमुख मार्गावरून जलदिंडी गेली. त्यात महिलांनी आपापल्या घरातून लोटाभर जल आणून कळसात टाकले. नंतर याच पाण्याने नागेश्वर मंदिरात जलाभिषेक करण्यात आला. मिरवणुकीत भगवान शंकर आणि पार्वती यांच्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधले. महिलांचा सहभाग लक्षवेधी होता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.