digital products downloads

जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना एकावेळी मिळेल 3 महिन्यांचे रेशन: अतिवृष्टी, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय, दुर्गम, सुगम क्षेत्राला लाभ‎ – Amravati News

जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना एकावेळी मिळेल 3 महिन्यांचे रेशन:  अतिवृष्टी, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय, दुर्गम, सुगम क्षेत्राला लाभ‎ – Amravati News

पावसाळ्याच्या मोसमातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना एकाचवेळी तीन महिन्याचे रेशन पुरवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. विशेष असे की त्यासाठी लागणारे धान्य रेशन दुकानदारांकडे पोहोचले असून, मंगळवारी १०

.

पावसाळ्यात मेळघाटातील काही गावांचा संपर्क मुख्य रस्त्यांपासून तुटतो. त्यामुळे तेथील रहिवाशांना सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत (पीडीएस) दरवर्षी चार महिन्यांचा शिधा एकाचवेळी दिला जातो. परंतु यावर्षी असा शिधा जिल्ह्यातील सर्व पात्र रेशनकार्डधारकांना पुरवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात दर महिन्याला ८६ हजार क्विंटल तांदूळ आणि २५ हजार क्विंटल गहू वितरित केला जातो. त्यामुळे यावेळी त्याच्या तिप्पट धान्य वितरित केले उर्वरित. पान ४ तिप्पट धान्य प्राप्त होणार अंत्योदयच्या कार्डधारकांना प्रतिकार्ड प्रतिमाह ४५ किलो धान्य पुरवले जाते. त्यात २० किलो तांदूळ, १५ किलो गव्हाचा समावेश आहे. तर प्राधान्य गटातील कार्डधारकांना दरमाणसी दरमहा एक किलो गहू , चार किलो तांदुळ पुरवले जातात. या खेपेला तीन महिन्याचे धान्य एकाच वेळी पुरवले जाणार असल्याने अंत्योदय व प्राधान्य गटांतील कार्डधारकांना तिप्पट धान्य प्राप्त होणार आहे.

प्रतिनिधी । अमरावती ‘येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांची लिंकींगमध्ये पिळवणूक होऊ नये, यासाठी राज्यस्तरावरून निर्देश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांच्या स्तरावर कृषी निविष्ठांमध्ये लिंकींगचे प्रकार झाल्यास कृषी विभागाने कारवाई करावी,’ असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार ४ रोजी कृषी विभागाचा आढावा घेण्यात आला. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार उपस्थित होते. खरीप हंगामात सुरवातीला बियाणे कमी पडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. शेतकरी विशिष्ट वाणाचा आग्रह करीत असल्यामुळे या बियाण्यांचा तुटवडा पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कंपनी स्तरावर प्रयत्न करून बियाण्यांची उपलब्धता होईल, यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे. कापूस पिकांसाठी पर्यायी असलेल्या उर्वरित. पान ४

या वेळी असे मिळेल धान्य

धान्य दुकानांत पोहोचले ^तीन महिन्यांसाठी पुरवले जाणारे धान्य जिल्ह्यातील बहुतेक रेशन दुकानांपर्यंत पोहोचवले आहे. त्यामुळे वाटपही सुरू होईल. तीन महिन्याचे धान्य एकावेळी मिळणार असल्याने रेशनकार्डधारकांनी त्या सोईने दुकानांत जावे. मेळघाटातील कार्डधारकांना योग्य ते सहाय्य करण्याच्या सूचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. निनाद लांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अमरावती.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp