
उबाठाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकात दिलेल्या सविस्तर मुलाखतीत देश आणि राज्यातील राजकारणावर ठाम मत व्यक्त केलं. संजय राऊत यांनी घेतलेल्या या विशेष संवादात उद्धव ठाकरे यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय
.
राजकारणातील काही फुगे हवेत आहेत, पण लवकरच फुटतील
राज्यात सध्या वेगवेगळ्या घडामोडी सुरु आहेत. यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या वाऱ्यांमध्ये काही हवेचे फुगे उडत आहेत. हे फुगे काही काळ वर जातात, पण नंतर त्यातील हवा निघते आणि ते फुगे खाली पडतात. हे खरे वारे नाहीत. यामागे कोणताही समाजहिताचा हेतू नाही, फक्त सत्तेची हाव आहे.
आता राज ठाकरेही सोबत
राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीबाबत त्यांनी सूचक विधान केलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, ठाकरे हे एक संघर्षाचं प्रतीक आहे. बाळासाहेबांपासून सुरू झालेला हा प्रवास आजही सुरू आहे. आणि आता राजही आमच्यासोबत आला आहे. हा लढा स्वार्थासाठी नव्हे, तर जनतेच्या हितासाठी आहे.
ठाकरे ब्रँड लोकांनी बनवला
ठाकरे ब्रँड 50 वर्षांहून अधिक काळ टिकून राहण्यामागचं गमक सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हा केवळ ब्रँड नाही, तर महाराष्ट्रात मराठी अस्मितेची आणि हिंदू अस्तित्वाची ओळख आहे. अनेकांनी हा ब्रँड संपवायचा प्रयत्न केला, पण जनता आजही आमच्यावर विश्वास ठेवते. कारण आम्ही कधीही स्वार्थाचं राजकारण केलं नाही. आज काही लोक स्वतःची तुलना देवांशी करत आहेत. ही अतिरेकाची परिसीमा आहे. असे लोक काळाच्या ओघात गेले आहेत आणि जातीलही. जनतेला सत्य कळतं आणि ते नेहमी खऱ्या बाजूशी उभे राहतात, असे म्हणत त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
म्हणून भाजपने बहुमत गमावले
उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांना स्वतःच्या मातोश्रीचा सन्मान करता येत नाही, त्यांना आमच्या मातोश्री बद्दल बोलण्याचा अधिकारच नाही. जेव्हा सत्ता आणि सत्तेच्या जोरावर भीती निर्माण केली जाते, तेव्हा एक वेळ अशी येते की जनता त्याविरोधात उभी राहते. मोदींनी लोकशाहीची खिल्ली उडवली. त्यामुळेच जनता जागी झाली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.