
सध्या अस्तित्वात असलेल्या भारताचे अखंडत्व टिकून ठेवणे आवश्यक असताना धर्म, भाषा, प्रांत अशा विविध मुद्यांना धरून दुही माजविण्याचे षडयंत्र सुरू आहे. सध्या देश आणि एकूणच जागतिक पातळीवर अशांततेचे वातावरण आहे. मात्र, देशात अराजकतेचा एक छोटा कालखंड येईल आण
.
थोर समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त भाई वैद्य फौंडेशन आणि आरोग्य सेना यांच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा असा ‘लोकनेते भाई वैद्य युवा नेता पुरस्कार, २०२५’ हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पत्रकार, राजकीय सामाजिक विश्लेषक आणि लेखक राजू परुळेकर यांना भाई वैद्य फौंडेशन व आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष, समाजवादी विचारवंत, लेखक आणि संपादक डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना राजू परुळेकर बोलत होते.
एस.एम.जोशी फौंडेशनच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर भाई वैद्य फौंडेशनच्या चिटणीस प्रा. डॉ.गीतांजली वैद्य, आरोग्य सेनेचे सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा, मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी, हनुमंत बहिरट आदी मान्यवर उपस्थित होते.
राजू परुळेकर म्हणाले की, आपल्या अंतःप्रेरणांशी प्रामणिक राहणाऱ्या पिढीमध्ये भाई वैद्य हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. स्वातंत्र्य ही भाई वैद्य, मधु लिमये, एस.एम. जोशी यांची अंतःप्रेरणा होती. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्य लढ्यांमध्ये या व्यक्तींनी खऱ्या अर्थाने नेतृत्वाचा झेंडा हाती घेतला. सध्या देशामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांचे डोंगर असताना देशातील जंगले तोडली जात आहे, अदानीसारख्या समुहाला देश विकला जात आहे, देशाच्या उपयोगी पडू शकणाऱ्या तरूण तडफदारांना तुरूंगात डांबले जात आहे. अलंकारीक नम्रपणाच्या आडून देशाच्या भवितव्याची चिरफाड केली जात आहे. स्वतःच्या नैतिक घसरणीचे समर्थन करणारे लोक आपले नेतृत्व करीत आहेत, हे दुर्दैव आहे. मध्यम आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांनी केलेल्या त्यागातून मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. हा महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे आणि मराठी भाषेचा आहे.
डॉ. अभिजित वैद्य म्हणाले की, राजकीय संस्कृती लयाला गेली असून ‘जोकर’ या हॉलीवूडपटाची आठवण करून देणारी परिस्थिती भारतासह जगाच्या काही देशांमध्ये दिसून येते. हिंसा मोठ्या प्रमाणावर फोफावली असून जग दोन बाजूंनी जागतिक युध्दाच्या उंबरठ्यावर आहे. आपल्या लोकशाहीची सत्ता सध्या मुठभर लोकांच्या हातात आहे, हे दुर्दैव आहे. जनतेचे राज्य ही संकल्पना नष्ट झाली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.