
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाचा पुण्यातून आणखी एक हुंडाबळीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हडपसर भागातील एका 22 वर्षीय विवाहितेने हुंड्यासाठी सासरच्याकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. देवकी उर्फ दीपा प्रसाद पुजारी असे या विवा
.
दीपाने लग्न झाल्यानंतर सुमोर महिनाभरातच हुंड्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आयुष्य संपवले. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुणे हादरले आहे. याप्रकरणी दीपाचे वडिल गुरुसंगप्पा म्यागेरी यांनी हडपसर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासू, सासरे, दीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपा आणि प्रसाद यांचा विवाह 18 एप्रिल 2025 रोजी कर्नाटकातील विजयपूर येथील बागेवाडीतील बसव मंगल कार्यालयात पार पडला. लग्नामध्ये दीपाच्या वडिलांनी लेकीच्या सासरच्या मंडळींना हुंडा म्हणून प्रसादला 4 तोळे सोने दिले होते. तसेच अंदाजे 10 लाख रुपयांचा खर्च करत मानपानासह लग्न लावून दिले होते.
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दीपा पुण्यात आली. मात्र, त्याच दिवसापासून पती प्रसाद व त्याची आई सुरेखा यांच्याकडून हुंड्याच्या नावाखाली छळ सुरू झाला. लग्नात भांडी, फ्रीज इतर वस्तू दिल्या नाहीत, यासह मानपान केला नाही म्हणून वाद घालून तिला शिवीगाळ आणि मारहाण केली, असा आरोप दीपाच्या वडिलांनी केला.
दीपाने तिच्या वडिलांना ही हकीगत सांगितली. सासरच्या जाचाला कंटाळून ती माहेरी निघून गेली. परंतु, त्यानंतर दीपाच्या सासऱ्याने तिची समजूत घातली आणि तिला पुन्हा पुण्यात घेऊन आले. त्यानंतर 18 मे रोजी दीपाने वडिलांना फोन केला व रडत लग्नात भांडी सामान दिले नाही, या कारणावरून प्रसाद, दीर, सासू आणि सासरे शिवीगाळ आणि मारहाण करत छळ करत असल्याचे सांगितले. त्यानंतर, दीपाच्या वडिलांनी मी पुण्यात येतो व वाद सोडवितो, असे सांगून तिची तात्पुरती समजूत काढली. मात्र, दुसऱ्याच दिवशी 19 मे रोजी दीपाने हडपसर मध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
लग्नाच्या महिनाभरातच दीपाने टोकाचे पाऊल उचलल्याने तिच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, त्यांनी सासरच्या मंडळींविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात पती प्रसाद चंद्रकांत पुजारी, दीर प्रसन्ना चंद्रकांत पुजारी, सासू सुरेखा चंद्रकांत पुजारी आणि सासरे चंद्रकांत पुजारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
हे ही वाचा…
वैष्णवीच्या मामे सासऱ्यांवर 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप:पोलिस महानिरीक्षक सुपेकरांचा दबाव, अंजली दमानियांचा हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवी हगवणे यांचा त्यांच्या सासरी हुंड्यासाठी छळ झाला होता. या प्रकरणी वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला अटक करण्यात आली आहे. तर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अद्यापही फरार असल्याचे समजते. त्यांना शोधण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. आता यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आयजी अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. पूर्ण बातमी वाचा…
अखेर वैष्णवीच्या बाळाचा ताबा कसपटे कुटुंबाकडे:अजित पवारांनी साधला वैष्णवीच्या वडिलांशी संवाद; आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री
वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात सुशिक्षित कुटुंबात देखील हुंडाबळीचा प्रकार घडल्याचे समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र हगवणे व कुटुंबीय यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दरम्यान वैष्णवीचे 9 महिन्यांचे बाळ कुठे आहे असा सवाल उपस्थित झाला होता. पूर्ण बातमी वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.