
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय वारसदाराविषयी प्रथमच भाष्य केले आहे. अनेकजण फडणवीसांची मुलगी त्यांचा राजकारणाचा वारसा पुढे चालवेल असा दावा करतात. पण आता स्वतः फडणवीसांनीच आपण आपल्या मुलीकडे राजकीय वारसदार म्हणून कधीही पाहणार नसल्याचे
.
मुंबईत आज राज्यस्तरीय ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ समारोप व कन्यारत्न सन्मान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सामाजिक योगदानावर भाष्य करताना आपली कन्या दिवीजाच्या भावी वाटचालीवरही प्रकाश टाकला. फडणवीस म्हणाले, कुटुंबात एकतरी मुलगा असावा असा अप्रत्यक्ष सामाजिक दबाव अनेकांवर असतो. पण मी माझ्या एका मुलीवरच खुश आहे. आजच्या काळात मुलांपेक्षा मुलीच आई-वडिलांची जास्त काळजी घेतात. मी स्वतः मुलीचा बाप आहे. त्यामुळे मी हे ठामपणे सांगू शकतो.
माझी मुलगी दिवीजा बोलण्यात हुशार आहे. ती पॉलिटिकली करेक्ट बोलते. पण मी माझ्या मुलीकडे राजकीय वारसदार म्हणून केव्हाही पाहणार नाही. दिवीजाची कायद्याचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे मी माझ्या घराण्यातला शेवटचा राजकारणी ठरेल.
2029 मध्ये राजकारणात एक तृतीयांश महिला
मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील महिलांच्या राजकीय सहभागावरही भाष्य केले. महाराष्ट्रातील महिलांचा राजकारणातील सहभाग वाढत आहे. पण अजूनही अनेक ठिकाणी गावपातळीवरील राजकारणात पुरुषांकडून ‘मी सरपंचपती’ अशी ओळख मला करून दिली जाते. मी राजकारणात प्रवेश केला तेव्हा पदावर असणाऱ्या महिलांचे 80 टक्के पतीच त्यांचे काम पहायचे. 1997 पर्यंत हा आकडा 50 टक्क्यांपर्यंत घसरला. त्यानंतर 2002 पर्यंत महिला बऱ्यापैकी स्वतःचे कामकाज करू लागल्या. पण 2029 मध्ये परिस्थितीत मोठा बदल होईल. राजकारणात एक तृतीयांश महिला दिसून येतील.
राज्यातील अनेक महत्त्वाच्या पदांवर महिला अधिकारी आहेत. अनेकदा त्या पुरुष अधिकाऱ्यांपेक्षाही चांगले काम करतात. त्यामुळे महिलेला सन्मानाची व समानतेची वागणूक देण्याचे शिक्षण हे लहानपणापासूनच शिकवले गेले पाहिजे. तसे संस्कारच घराघरांतून झाले पाहिजे. ज्या देशांनी आपल्या अर्थचक्राची 50 टक्के भागीदारी महिलांकडे दिली, त्या देशांचा विकास झाला. त्यामुळे महिलांना अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणेपर्यंत तथा त्यांना मानवसंसाधन म्हणून विकसित करणार नाही तोपर्यंत भारत विकसित होणार नाही, असे ते म्हणाले.
अनेक जिल्ह्यांचे लिंग गुणोत्तर सुधारले
आपल्या समाजात स्त्री भ्रुण नष्ट करण्याची कुप्रथा सुरू झाली होती. काही जिल्ह्यांत लिंग विषमता होती. पण बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमामुळे या जिल्ह्यांत सुधारणा होत आहे. काही जिल्ह्यांत, तालुक्यांत मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही अशी स्थिती आहे. पण महाराष्ट्रात 2015 मध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ उपक्रम सुरू झाल्यानंतर या जिल्ह्यांत मोठी सुधारणा झाली. त्यांचे लिंग गुणोत्तर सुधारले, असे फडणवीस म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.