
राज्यभरात बिबट्याच्या हल्ल्यात पशुधनासोबतच मानवावर हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. गेल्या काही दिवसात बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढला आहे. त्यामुळे अनेक निष्पाप बालकांचा देखील मृत्यू झाला आहे. याबाबत आपण न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची म
.
या संदर्भात आपण वन विभागाकडून माहिती घेतल असून त्यावर अभ्यास सुरू असल्याचे सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे. या संदर्भात वकिलांचा सल्ला घेऊन लवकरच न्यायालयात जाणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. संगमनेर आणि राहता तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आपण वन विभागाकडून ही सर्व माहिती घेत असून यावर अभ्यास आता पूर्ण होत आला असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
साई भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी संस्थांच्या वतीने अन्नछत्राच्या माध्यमातून मोफत जेवण दिले जाते. मात्र आता त्यासाठी कूपन बंधनकारक करण्यात आले आहे. कूपन असेल तरच भाविकांना प्रसादाचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे आता साई भक्तांचा खरा आकडा आपल्यासमोर येणार असल्याचे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. शिर्डीत विविध ठिकाणांवरुन आलेले आणि स्थायिक झालेले नागरिक तसेच खरे भक्त यांच्या आकडेवारीतील फरक आता समोर येणार असल्याचे देखील ते म्हणाले. शिर्डी संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या ड्युटीवर बदल करण्यासंदर्भात त्यांनी वक्तव्य केले आहे. बदल करणे शक्य नसले तरी आगामी काळात कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा सुरू केली जाऊ शकते का? याचा विचार करावा लागेल, असे देखील विखे पाटील यांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.