
बीडचे परळी म्हणजे एक दहशतीचा आता अड्डा झालेला आहे. सीमेवर जसे ऑपरेशन सिंदूर केले तसेच महाराष्ट्राच्या बीडमध्ये करण्याची गरज आहे, असे अंजली दमानिया यांनी शिवराज दिवटे नावाच्या तरुणाचे अपहरण करून 8 ते 10 जणांच्या टोळक्याने अमानुष मारहाण केली, या घटनेचा
.
नेमके दमानिया काय म्हणाल्या?
अंजली दमानिया म्हणाल्या की, बीडचे परळी म्हणजे एक दहशतीचा आता अड्डा झालेला आहे. या विषयाला गंभीरतेने घ्यायला हवे. कारण कालची जी मारहाण झाली त्यातली जी सगळी मुले होती ती अतिशय छोटी आणि 18 वर्षांच्या आसपासची होती. त्यांनी केलेली मारहाण बघून ज्याला मारले त्याला ज्या पद्धतीने पाया पडायला लावले हे सर्व बघून असं वाटतंय की ही रिवेंज केस होती.
अंजली दमानिया म्हणाल्या की, वातावरण आता कुठेतरी भलत्या दिशेने जात आहे. जसे ऑपरेशन सिंदूर पाकच्या सीमेवर केले होते तसेच महाराष्ट्राच्या बीडमध्ये करण्याची गरज आहे, असे मला वाटते. बीडचे परळी हे दहशतीचा अड्डा झालेला आहे, या विषयाला गंभीरतेने घेण्याची गरज आहे.
नेमके प्रकरण काय?
परळीमधल्या (जि. बीड) धार्मिक कार्यक्रमात गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने मुलींची छेड काढल्याचा गंभीर प्रकार घडला. या गैरवर्तनाला एका तरुणाने विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या टोळक्याने या तरुणाचे अपहरण करून त्याला अमानुष मारहाण केली असून, या घटनेचा व्हिडिओ तयार केला. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संपूर्ण जिल्ह्यात संतापाचा उद्रेक झाला आहे.
आरोपी स्थानिक नेत्याशी संबंधित असल्याची चर्चा
या संपूर्ण घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपी युवकांचे स्थानिक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच पोलिस प्रशासन दबावाखाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी या घटनेच्या सखोल चौकशीची आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.