
दरमहा दीड लाख रुपये पगार घेणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दाम्पत्याचा मुलगा इंग्रजी मीडियम शाळेत शिकतो. पण त्या इंग्रजी मीडियमध्ये शिकवणाऱ्या मॅडमला केवळ 12 हजार पगार आहे. त्यामुळे इंग्रजी मीडियम शाळेचे पेव कुणामुळे फुटले? हे सांगा, अशा शब्दांत र
.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने 31 शिक्षिकेंचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव केला. यावेळी बोलताना जयकुमार गोरे वरील सवाल केला. ते म्हणाले, सध्या पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे कल वाढला आहे. इंग्रजी आली पाहिजे, पण आपली संस्कृती सोडून या गोष्टी होता कामा नये. त्यामुळे शिक्षकांनी इंग्रजी माध्यमांकडे कल का वाढला? याचा विचार करण्याची गरज आहे.
प्राथमिक शिक्षकांनी आपल्या शाळेची पटसंख्या कमी का होत आहे? याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणी त्यांनी ज्या प्राथमिक शाळांची पटसंख्या जास्त आहे, अशा शाळांची यादी करून तेथील अभ्यास करणे गरजेचे आहे. सरकार शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही. पण शिक्षकांनीही गुणवत्तापूर्ण शिक्षण सोडता कामा नये.
सरकारपुढे बाका प्रसंग उभा -पडळकर
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या प्रकरणी आपले मनोगत व्यक्त केले. सरकारने वाडीवस्त्यांवरील जिल्हा परिषदेच्या शाळंवर प्रचंड खर्च केला. पण त्यानंतरही तेथील पटसंख्या कमी होत आहे. यामुळे सरकारपुढे बाका प्रसंग उभा झाला आहे. सरकार एका बाजूला हम दो हमारे दोचा नारा देत आहे आणि दुसरीकडे, शाळांमध्ये मुले नाहीत असा सूर आहे.
आता माझे हम दो पण नाही आणि हमारे दो पण नाही. त्यामुळे यावर मला आत्ता बोलायचा अधिकार नाही. पण हम दो, हमारे दोचा कायदा आला, मात्र हेच हम दो हमारे एकवर आले आहे. शाळेत आता मुलेच नसल्याने पटसंख्या रोडावली आहे. त्यामुळे पटसंख्या कमी असणाऱ्या शाळांचे करायचे काय? असा प्रश्न सरकारपुढे उभा टाकला आहे, असे पडळकर म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने गतवर्षी 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील 14 हजार 783 शाळांमध्ये आता प्रत्येकी एक सेवानिवृत्त शिक्षक (70 वर्षांची वयोमर्यादा) किंवा डीएड-बीएडधारक तरुणाची नेमणूक केली जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील तेवढी पदे कायमचीच संपुष्टात येतील, असे बोलले जात आहे.
हे ही वाचा…
डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा:तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सापडले होते वादात; प्रसूतीसाठी 10 लाख डिपॉझिट मागितल्याचा ठपका
पुणे – पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वादग्रस्त डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांच्यावर टीकेची चौफेर झोड उठत होती. अखेर या प्रकरणी राज्य सरकारच्या समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.