
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादामुळेच राहुल सोलापूरकरवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. राहुल सोलापूरकर हा मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या आणि त्यांच्या टोळीतला माणूस आहे. त्यामुळे त्याच्यावर क
.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने धाराशिव जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. या निमित्ताने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. धाराशिव जिल्ह्यामध्ये जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दुचाकी रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राहुल सोलापूरकर यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर टीका केली.
धाराशिव येथील कार्यक्रमात उपस्थित मनोज जरांगे पाटील.
नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर टीका
राज्य सरकारच्या वतीने छावा हा चित्रपट टॅक्स फ्री करायला हवा. मात्र हा तिरस्काराचा भाग असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आरक्षण असो, छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा छत्रपती संभाजी महाराज असो. हे सरकार तिरस्काराने भरलेले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण किंवा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण, महादेव मुंडे प्रकरण असे अनेक जणांचे मर्डर झाले असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील आणि देशातील सर्व जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्या. मात्र, आज चांगला दिवस आहे. त्यामुळे नासक्या मंत्र्यांचे नाव घ्यायला नको, असे म्हणत त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.