
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी युगपुरुषांचा वारंवार होणारा अवमान थांबवण्यासाठी अजामीनपात्र कायदा तयार करण्याची मागणी केली. त्यांनी यासंबंधी सरकारकडे शिवरायांचा इतिहास प्रकाशित करण्याचाही आग्रह धरला आहे. छत्रपती श
.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना किल्ले रायगडावर जाऊन अभिवादन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना उदयनराजे भोसले यांनी उपरोक्त मागणी केली. ते म्हणाले, मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 4-5 मागण्या करणार आहे. आज आपण एका थोर व्यक्तीपुढे नतमस्तक होण्यासाठी येथे आलो आहोत. शिवाजी महाराजांनी समतेचा विचार दिला. त्यांनी लोकांसाठी आपले उभे आयुष्य वेचले. स्वराज्याची स्थापना केली. त्यांनीच लोकशाहीचा विचार दिला. राज्य कारभारात लोकसहभाग असावा ही त्यांचीच संकल्पना होती. त्यांनी त्याचा मूळ पाया रचला. पण अलीकडच्या काळात त्यांचा वारंवार अवमान केला जात आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी एक कायदा तयार करण्यात यावा. हा कायदा नॉन बेलेबल असावा. युगपुरुषांचा अवमान करणाऱ्यांना 10 वर्षे जामीन मिळता कामा नये.
शासनाने महाराजांचा इतिहास प्रकाशित करावा
एखादा लेखक स्वतःच्या संकल्पनेतून एखादी कादंबरी लिहितो, पण त्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नसतो. त्यामुळे अलीकडच्या कालोात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व युगपुरुषांविषयी गैरसमज निर्माण होतो. त्यामुळे सरकारने स्वतः शिवाजी महाराजांचा इतिहास प्रकाशित करावा. यामुळे कोणत्याही प्रकारचे सामाजिक तेढ निर्माण होणार नाही. या प्रकरणी सिनेमॅटीक लिबर्टीच्या संदर्भातही एक सेन्सॉर बोर्ड करण्याची गरज आहे.
बुद्ध सर्किटच्या धर्तीवर शिवरायांचे सर्किट तयार करा
मी यापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस व केंद्राकडे बुद्ध सर्किटच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्किट तयार करण्याची मागणी केली होती. ही मागणी कालच मान्य करण्यात आली. माझी दिल्लीत शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक करण्याचीही मागणी आहे. दावणगिरी जिल्ह्यातील शहाजी महाराजांच्या समाधीसाठी केंद्र व राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा. अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमीपूजन झाले. त्यात काही अडचणी आल्या असतील. राज्यपाल भवनात मुबलक जागा आहे. हे स्मारक तिथेही करता येईल. अशी अनेक लोकांनी मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण झाली तर राज्याला आनंदच होईल, असेही उदयनराजे यावेळी बोलताना म्हणाले.
हे ही वाचा…
महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांची खैर नाही:अशा लोकांना टकमक टोकावरून लोटले पाहिजे, फडणवीस यांनी दिले कायदा करण्याचे संकेत
रायगड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना कठोर शासन करण्याप्रकरणी एक कायदा करण्याचे संकेत दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना खरेतर टकमक टोकावरून लोटले पाहिजे. पण आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामु्ळे या प्रकरणी निश्चित असे काही नियम तयार केले जातील, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.