
भाजपने ज्यांच्याविरोधात मोर्चे काढले, तेच लोक आज भाजपसोबत सत्तेत आहेत. भाजपच्या या स्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मंगळवारी केली. यावेळी त्यांनी सध्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवे
.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या 11 व्या स्मृतीदिनानिमित्त प्रकाश महाजन यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भाजपच्या विद्यमान धोरणांवर निशाणा साधला. ते म्हणाले, पूर्वी भाजपमध्ये चळवळीत काम करणाऱ्यांना प्रवेश दिला जात होता. गोपीनाथ मुंडे हे स्वतः चळवळीतून आले होते. त्यांचे सर्वच नेत्यांशी चांगले संबंध होते. पण आज भाजपची अवस्था पाहिल्यावर खंत वाटते. आता भ्रष्टाचारातून भाजपमध्ये एन्ट्री मिळते. अशोक चव्हाण, अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासारखे लोक आज भाजपसोबत आहेत.
भाजप आज प्रोफेश्नल पक्ष झाला
छत्रपती संभाजीनगरमध्ये सिंचन घोटाळ्यासंबंधी एक मोर्चा निघाला होता. त्यात गोपीनाथ मुंडे यांचे डोके फुटले होते. ज्यांच्याविरोधात हा मोर्चा निघाला होता, तेच लोक आज देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला बसल्याचे दिसतात. ही दुर्दैवी गोष्ट आहे. संघर्षाच्या काळात अनेकजण भाजपसबोत होते. पण सत्ता आल्यानंतर ते कुठेच दिसत नाही. भाजप आज प्रोफेश्नल पक्ष झाला आहे. विशेष म्हणजे त्यांचे शिष्य समजल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी पक्षाची ही अवस्था केली आहे, असे ते म्हणाले.
फडणवीसांना दिला होता पाठिंबा
प्रकाश महाजन यांनी यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पाठिंब्याची एक आठवणही सांगितली. गोपीनाथ मुंडे यांचा स्वभाव आव्हानांना सामोरे जाण्याचा होता. त्यांनी कधीही आव्हानांना पाठ दाखवली होती. त्यांच्या मृत्यूच्या आदल्या रात्री एक बैठक झाली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला एका मोठ्या नेत्याने विरोध केला होता. पण गोपीनाथ मुंडेंनी त्यांचे काहीही ऐकले नाही. त्यांनी फडणवीस यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.
गोपीनाथ तू यांच्या नादी लागू नकोस, काँग्रेसमध्ये जा
माझे वडील काँग्रेस व नेहरूंच्या विचारसरणीचे होते. त्यामुळे गोपीनाथ मुंडे आमच्याकडे आले की, पहिल्यांदा त्यांची भेट घ्यायचे. त्यावेळी आमचे वडील त्यांना म्हणायचे की, गोपीनाथ तू यांच्या (भाजप) नादी लागू नकोस. काँग्रेसमध्ये जा. तिथे तू मुख्यमंत्री होशील. पण दुर्दैवाने ते मुख्यमंत्रीपदापासून फक्त एकच पाऊल मागे राहिले, असेही प्रकाश महाजन यावेळी बोलताना म्हणाले.
हे ही वाचा…
लाडक्या बहिणीची आर्त हाक सरकारच्या कानावर पडेल का?:पाटील, वडेट्टीवार, पवारांचा सवाल; शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा झाला लाल चिखल!
बीड – काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार रोहित पवार यांनी अवकाळी पावसामुळे नुकसानीच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्याची मागणी केली आहे. या तिन्ही नेत्यांनी यासंबंधी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात बीड जिल्ह्यातील एक गरीब शेतकरी महिला धायमोकलून रडताना दिसून येत आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.