
विधानसभा निवडणुकीत आपण भ्रमात राहिलो. 181 जागा येणार म्हणून कोण मुख्यमंत्री होणार याचा विचार करत बसलो. पण आपण विरोधी पक्षनेत्याच्या संख्येपर्यंतही पोहचू शकलो नाही, असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या
.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पाटील यांच्या उपस्थितीत आज सांगलीमध्ये पक्षाचा मेळावा पार पडला. विधानसभा निवडणुकीत दारुण झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कान टोचले.
नेमके काय म्हणाले हर्षवर्धन पाटील?
लोकसभेला 31 जागा आल्यानंतर आपण हिशोब करत बसलो. एका मतदारसंघात एका खासदाराला 6 आमदार. कुणीतरी म्हटले 181 चा आकडा आपला गाठतोय. त्यानंतर आपली पारावर बसल्या बसल्या चर्चा सुरू झाली. आता काही चिंता करू नका. 1-1 लाख मतांचा फरक आहे. 50-50 हजार मतांचा फरक आहे. आपण या सगळ्या भ्रमात दुर्दैवाने राहिलो. दुसऱ्या बाजुला लोकसभेला आपला पराभव झाला. आता आपल्याला तळागाळाला जावे लागेल. ही भूमिका त्यांनी (महायुती) स्वीकारली. आपण भूमिका स्वीकारली, कोण मंत्री होणार? कोण मुख्यमंत्री होणार? पुढे काय होणार? या सगळ्या गोष्टी दुर्दैवाने या घडल्या. त्याचा परिणाम असा झाला, आज आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा एका पक्षाच्या विरोधी पक्षनेत्याच्या संख्येपर्यंतच्या संख्याबळापर्यंत आपण जाऊ शकलो नाही. याचा विचार आपल्याला करायचा की नाही करायचा? हा प्रश्न या मेळाव्यामध्ये करण्याची आवश्यकता असल्याचे पाटील म्हणालेत.
पराभवाच्या कारणांतून बोध घ्यावा लागेल
विधानसभेच्या पराभवाची कारणे काय? याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल. अनेक कारणे आहेत, त्याचा शोध घ्यावा लागेल. त्यातून बोध घ्यावा लागेल. त्यातून दिशा घेऊन आपल्याला पुढे जावे लागणार आहे. बऱ्याच मतदारसंघात माणसे बोलतात, भाऊ आम्ही तुम्हाला मतदान केले. मग आमचे मत गेले कुठे? हे मी नाही, तर मतदार विचारत आहे, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
आपण काम करण्यात कुठे कमी पडलो?
आपला कार्यकर्ता मतदारापर्यंत पोहोचला का? त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. त्या योजनेच्या संदर्भात तळागाळात काय झाले? याचे अवलोकन आपण केले का? शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरिता आपण कुठपर्यंत गेलो? युवकांच्या बेरोजगारीसाठी आपण कुठपर्यंत गेलो. या सगळ्या गोष्टींकडे काम करण्यामध्ये आपण कमी पडलो, असे मला वाटतं, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
आता ‘हॅलो’ ऐवजी ‘जय शिवराय’ म्हणा
दरम्यान, या मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे यांनी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांना मोठी सूचना केली आहे. कोणताही फोन आला तर, सुरुवातीला हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणायचे, असे शिंदे म्हणाले. हा प्रांताध्यक्षांचा आदेश असल्याचेही शशिकांत शिंदे म्हणाले. गावा-गावांमध्ये ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज शेवटपर्यंत लढले, त्यांनी हार मानली नाहीत. त्यांच्यासोबत जे शेवटपर्यंत लढले ते इतिहासामध्ये अजरामर झाले. तसेच, तुम्ही देखील पक्षासोबत शेवटपर्यंत लढा, असे आवाहन शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.