
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक संदर्भात शरद पवार यांनी मोठे भाष्य केले आहे. लोकांना सोबत घ्यायचा दृष्टीकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती, अशा शब्दात त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्
.
या संदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक हा स्थानिक प्रश्न आहे. आजूबाजूला जे तालुके आहेत त्यांचे लक्ष इथे नाही. माळेगाव सहकारी साखर कारखाना माझ्या नावाने ओळखला जातो, ही चांगली गोष्ट आहे. या निवडणुकीत आमची टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती आणि आजही नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. एक विशिष्ट स्थिती निर्माण झाली होती. लोकांना सोबत घ्यायचा दृष्टीकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती. म्हणजे झाले ते ठीक झाले, असे म्हणत शरद पवार यांनी याविषयी अधिक बोलणे टाळले आहे.
शरद पवार म्हणाले की, जे झाले ते दीर्घकालीन झाल्याचे आम्ही समजत नाही. हा कारखाना 19000 सभासदांपुढचा प्रश्न आहे. बारामतीत सूतगिरणी झालीच नाही. एकेकाळी बारामती हा कापसाचा भाग होता. परंतु आता कापूस येथे राहिला नाही. चंद्रराव तावरे यांच्याशी काही लोकांचे बोलणे झाले होते. त्यांना अडचण होती. त्यामुळे आम्ही जास्त ताणले नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन आणि कौतुक
काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारने आता यासाठी 500 कोटींचा निधी जाहीर केला आहे. या निर्णयाचे शरद पवार यांनी कौतुक केले. देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेण्याचे धाडस दाखवले आहे. देशातील महाराष्ट्र हे कृषी क्षेत्रात एआय स्वीकारणारे पहिले राज्य ठरले असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे मी सरकारचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत असल्याचे देखील शरद पवारांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.