ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना तातडीने ‘Y+’ सुरक्षा: संजय राऊतांच्या ‘ऑपरेशन तुडवा’च्या इशाऱ्यानंतर गृह विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये – Mumbai News

ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना तातडीने ‘Y+’ सुरक्षा:  संजय राऊतांच्या ‘ऑपरेशन तुडवा’च्या इशाऱ्यानंतर गृह विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये – Mumbai News



शिवसेना शिंदे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटातून बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या ६ खासदारांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या थेट इशाऱ्याची गंभीर दखल घेत, गृह विभागाने या सर्व बंडखोर खासदारांना तातडीने ‘Y+’ (वाय प्लस) दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे आदेश दिले आहेत. या सुरक्षेबाबत महाराष्ट्र सरकारच्या गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन यांनी काल (१७ जून) सर्व पोलीस आयुक्तांना आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना एक तातडीचा अधिकृत वायरलेस मेसेज जारी केला आहे. खासदारांच्या या बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने या लोकप्रतिनिधींना तात्काळ कडक सुरक्षा कवच देण्याचे निर्देश दिले आहेत. सुरक्षा पुरवण्यात आलेले ६ बंडखोर खासदार कोण? संजय देशमुख (खासदार, यवतमाळ) संजय जाधव (खासदार, परभणी) संजय दिना पाटील (खासदार, ईशान्य मुंबई) नागेश पाटील आष्टीकर (खासदार, हिंगोली) ओमराजे निंबाळकर (खासदार, धाराशिव) भाऊसाहेब वाघचौरे (खासदार, शिर्डी) “गद्दारांविरोधात ‘ऑपरेशन तुडवा’ चालवणार!” – संजय राऊत संतप्त आपल्या खासदारांनी पक्षाशी दगाफटका केल्याने आणि सरकारने त्यांना व्हीआयपी सुरक्षा बहाल केल्याने खासदार संजय राऊत यांनी सरकारवर आणि बंडखोरांवर अत्यंत तीव्र शब्दांत कडाडून टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी थेट युद्धाचीच भाषा केली, ते म्हणाले, “तुम्ही सर्वजण शिवसेना पक्षाच्या जिवावर, कार्यकर्त्यांच्या रक्तावर आणि बाळासाहेबांच्या चिन्हावर निवडून आले आहात. जर तुमच्यात खरंच हिंमत असेल, तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा जनतेच्या दरबारात उभे राहून निवडून येऊन दाखवा. या गद्दारांनी वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षातच हा पाठीत खंजीर खुपसण्याचा नीच प्रकार केला आहे. आता आम्ही गद्दारांना सोडणार नाही, त्यांच्याविरोधात ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करत आहोत. तुम्ही तुमची यंत्रणा आणा, आम्ही आमची फौज मैदानात उतरवतो!” संजय राऊत यांनी सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर या बंडखोर खासदारांमध्ये स्वतःची काही राजकीय ताकद किंवा लोकसंग्रह नाही, ते जर जनमानसात लोकप्रिय आहेत, तर मग जनतेच्या पैशातून त्यांना तातडीने ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याची भीती सरकारला का वाटली? असा थेट सवाल त्यांनी गृहविभागाला विचारला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp