digital products downloads

75% देश तापला, महाराष्ट्रात तीव्र उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट: वर्धेत उष्माघाताने 4 दिवसांत 9 मृत्यू, संभाजीनगर 41.6 तापमान

75% देश तापला, महाराष्ट्रात तीव्र उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट:  वर्धेत उष्माघाताने 4 दिवसांत 9 मृत्यू, संभाजीनगर 41.6 तापमान

  • Marathi News
  • National
  • 75% Of The Country Is Hot, Red Alert For Severe Heat Wave In Maharashtra, 9 Deaths Due To Heatstroke In Wardha In 4 Days, Temperature In Sambhajinagar 41.6

नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

देशभरात तीव्र उष्णतेचा प्रकोप बुधवारीही राहिला. २ डझन शहरांचे तापमान ४५ अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. आठ राज्यांतील ३४ शहरांमध्ये सकाळी ९:३० वाजताच पारा ३८ ते ४२ अंशांपर्यंत जात आहे. यूपीमधील बांदा सलग दुसऱ्या दिवशी ४८ अंश तापमानासह देशातील सर्वात उष्ण ठिकाण राहिले. तर वर्ध्यात पारा ४७.१ वर गेला.

हे या वर्षातील सर्वाधिक तापमान आहे. हवामान विभागाने पुढील ३ दिवस उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या ३ राज्यांत भयंकर उष्णतेच्या लाटेचा ‘रेड अलर्ट’ जारी केला. वर्ध्यात गत ४ दिवसात उष्माघात व पाण्याविना ९ जण दगावले.

राज्यात १५ शहरे ‘४०’पार वर्धा ४७.१ नागपूर ४६.६ अमरावती ४६.४ चंद्रपूर ४६.२ अकोला ४५.२ यवतमाळ ४५.२ गोंदिया ४४.९ नांदेड ४३.० वाशिम ४२.६ जळगाव ४२.१ जालना ४२.० मालेगाव ४१.६ संभाजीनगर ४१.६ बुलढाणा ४१.० बीड ४०.४ धाराशिव ३९.१ अहिल्यानगर ३८.८ सोलापूर ३८.६ अलिबाग ३७.१ सांगली ३७.० पुणे ३६.३ नाशिक ३६.२ सातारा ३६.२ डहाणू ३५.९ मुंबई ३४.४ सांताक्रुझ ३४.० पणजी ३४.० रत्नागिरी ३३.६ कोल्हापूर ३२.९ महाबळेश्वर २६.९

बांद्यात १९५१ नंतरचे सर्वोच्च तापमान

  • बांद्यामध्ये ४८ अंश तापमानामुळे सकाळी १० वाजेपासूनच तिथे कर्फ्यूसारखे चित्र पाहायला मिळत आहे.
  • १९५१ नंतरचे हे बांदा येथील सर्वोच्च तापमान आहे. २०२६ मध्ये चौथ्यांदा हे देशातील सर्वात उष्ण ठिकाण बनले आहे.

एल निनो : खरीप पिकांचे उत्पादन १०% घटणार

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञांनी एका संशोधनात सांगितले आहे की, जेव्हा जेव्हा एल निनोची परिस्थिती निर्माण झाली, त्या वर्षी ७७ जिल्ह्यांमध्ये खरीप पिकांचे उत्पादन घटले आहे. या वर्षीही अशीच शक्यता वर्तवली जात आहे. २००२, २००४ आणि २००९ च्या एल निनो वर्षांमध्ये ७७ जिल्ह्यांत भाताच्या (धान) उत्पादनात १०%, तर ६५ जिल्ह्यांत मक्याच्या उत्पादनात ८% घसरण झाली होती. याचा सर्वाधिक प्रभाव आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात पाहायला मिळाला होता.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp