Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education
‘नीट’ पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाची धग आता राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून वाढता पाठिंबा मिळत असून, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्येही आज विद्यार्थी आणि पालकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आक्रोश व्यक्त केला....
मुंबईत सध्या सुरू असलेल्या विविध आंदोलनांदरम्यान विनयभंगाच्या आरोपांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला दादरमधील ‘सीजेपी’ (CJP) आंदोलनादरम्यान साध्या वेशातील पोलिसाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, तर दुसऱ्या . चित्रा वाघ यांचा अनिल देशमुखांवर गंभीर आ...
बारामती येथे एसटीच्या प्रलंबित बिलासाठी पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या एका सहकारी बँकेच्या संचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. अनिल बंकर (वय 51, रा. पापर्डे, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बारामती शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध...
‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटी, गैरव्यवहार आणि दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आता थेट ‘नीट’ परीक्षाच . प्रकाश आंबेडकरांचे ट्विट प्...
सरकार सर्व प्रश्नांवर चर्चा करायला तयार आहे. विरोधकांना ही चर्चा होऊ द्यायची नाही, काँग्रेस चर्चेपासून पळ काढत आहे. काँग्रेसला या देशात अराजकता निर्माण करायची आहे. नेपाळ, बांगलादेशमध्ये जशी परिस्थिती तयार झाली त्याच पद्धतीने देशात राजकीय अस्थिरता निर्माण करायची, देशात विद्रोह निर्माण करायचा हा अजेंडा का...
पुण्यात ‘डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी ९४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. कल्याणीनगर येथील ५५ वर्षीय व्यावसायिकाने याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या मोबाइलवर संदेश पाठवून त...
मुंबईतील शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या वरळी येथील निवासस्थानी झालेल्या तब्बल 2.65 कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अनेक वर्षे घरात काम करणाऱ्या विश्वासू नोकराला अटक करण्यात आली असून, इतर संशयितांचा शोध सुरू आहे. सोन्याचे बिस्किट, हिऱ्यांच...
वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अकोट शहर व तालुक्यात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रात आंदोलक शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. त्यांनी बंदचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी शहरातील मुख्य मार्गांवरून फिरत व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्या...
चांदोरी येथील के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयात कर्मवीर काकासाहेब वाघ, सहकार महर्षी माधवराव (तात्यासाहेब) बोरस्ते आणि दानशूर काकुशेठ उदेशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असे आवाहन प्राचार्य...
संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 1275 मधला. तेव्हा महाराष्ट्रात यादव वंशाचे राजा रामदेवराय यांचे राज्य होते. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात याचा उल्लेख येतो. त्या काळी अंधश्रद्धा पराकोटीला पोहचलेली. भूत, नवससायास, जादूटोणा, कर्मकांडाचे महत्त्व प्रचंड वाढलेले. ज्ञानेश्वरांसह त्यांच्या सर्व भावंडांना...
नीट परीक्षा घोटाळा, पेपरफुटी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस यंत्रणेकडून होत असलेल्या कठोर कारवाईवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत अत्यंत आक्रमक झाले आहेत. मुंबईत १५०० आंदोलक विद्या . संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणत...
नांदगाव खंडेश्वर येथे गुरुवार, २३ जुलै रोजी दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी डाव्या आघाडी व वंचित बहुजन आघाडीने निदर्शने केली. या आंदोलनादरम्यान शहरात बंदही पाळण्यात आला. डावी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथी...
अमरावतीमध्ये ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही उमटले. शहरात विविध ठिकाणी धरणे, निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि कम्युनिस्ट प...
तिवसा येथे गुरुवारी सर्वपक्षीय व सर्व संघटनांनी एकदिवसीय बंद पाळला. दिल्लीत पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता. या बंदला व्यापारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शेतकरी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांसह सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर...
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातल्या पांढरी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या वडुरा गावातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. घरकुल योजनेचा लाभ तातडीने मिळावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील घटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ह...
नागपूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांचे निलंबन राज्य शासनाने रद्द केले आहे. त्यांची अमरावती जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर पुनर्रस्थापना करण्यात आली असून, काळुसे यांनी दोन दिवसांपूर्वीच अमरावतीत आपल्या नव्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. शासनाच्या आदेशानुसार, स...
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशानुसार नीटसह विविध स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटीच्या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची स्थापना केली जात आहे. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणणे आणि दोषींना...
वारजे माळवाडी पोलिसांनी एका घरफोडीचा गुन्हा अवघ्या एका तासात उघडकीस आणत सराईत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीतील काही मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी वारजे येथील जनता नगर परिसरातील एका पीजीमध्ये ही...
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. यंदाच्या आषाढी वारीत राज्यातील...
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यात गुरुवारी भर पावसात विद्यार्थी व युवक रस्त्यावर उतरले. युनायटेड यूथ फ्रंटच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या या मोर्चात . पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास...
राज्यात विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त मोर्चाची घोषणा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना, “सरकारविरोधात एखादा मुद्दा मिळाला की विरोधी पक्ष त्याचा फायदा घेतो. तेच त्यांचे काम असते,” असे...
पुण्यातील १६ वर्षीय स्क्वॉशपटू अनिका दुबे हिची कॅनडामध्ये होणाऱ्या वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. २० ते ३१ जुलैदरम्यान नायगरा-ऑन-द-लेक येथे होणाऱ्या या स्पर्धेत अनिका भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. अलीकडेच चीनमध्ये झालेल्या ३३व्या आशियाई ज्युनियर वैयक्त...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेवर गंभीर टीका केली आहे. ही योजना शेतकऱ्यांची फसवणूक असून, ‘सात-बारा कोरा’ करण्याच्या दाव्याचा फुगा फुटल्याचे त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला राज्यातील शेतकऱ्य...
ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्थेवर जोरदार टीका केली. “न्यायालयाला कबुतर, कुत्र्यांकडे लक्ष द्यायला वेळ आहे; . उद्धव ठाकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे आंदोल...
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी गुरुवारी बारामतीत विकासकामांच्या पाहणीसाठी जात असताना रस्त्यावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले. अपघातग्रस्त तरुणीला पाहताच त्यांनी आपला ताफा थांबवला, तिची विचारपूस केली आणि तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्थ...
स्वतःला साक्षात महादेवाचा अवतार आणि ‘कॅप्टन’ म्हणवून घेत भाविकांची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोककुमार एकनाथ खरात याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सुमारे 42 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने खरातविरोधात आरोपपत्र दाखल केले असून, तपासादरम्यान त्याचे अनेक...
नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलीय. रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाच्या संततधारेमुळे गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केले असून रामकुंड परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. गोदाघाटावरील अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली असून, दुतोंड्या...
नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भक्कम पाठिंबा दिला आहे. देशात लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांना दडपशाहीने चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत, अण्णा हजारे आज अहिल्यानगरमध...
शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यात बुधवारी पहाटे व दिवसभर पावसाची संततधार होती. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ९ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात मान्सूनचा सरासरी पाऊस ४४८.१ इतका कोसळतो. संपूर्ण जून महिना आणि जुलैच्या २२ तारखेपर्यंत १७४.१ मिमी प्रत्यक्ष पाऊस पडला. तो मान्सूनच्या एकूण सरासरीच्या ३८.९ टक्के इतका आहे. संततध...
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी आज सकाळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, कालच जंतरमंतरवर जाऊन शरद पवारांनी ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या . मात्र, या अनपेक्षित भेटीनंतर सोशल मीडिया...
छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आज क्रांती चौकात तीव्र निदर्शने आणि रस्ता रोको आंदोलन केले. देशातील शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी, NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरण आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवरील पोलिस लाठीहल्ल्याच्या निषेधा . या आंदोलनाचे नेतृत्व शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्...
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे २२ ते २८ जुलैदरम्यान बोन मिनरल डेन्सिटी (बीएमडी) तपासणी शिबिरास प्रारंभ झाला आहे. अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागामार्फत डॉ. एम. बी. लिंगायत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितद...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी २९ महाविद्यालयांवर प्रवेश बंदी घातली आहे. प्राध्यापकांची भरती न केल्याने विद्यापीठाने हा कठोर निर्णय घेतला आहे. यामुळे ऐन प्रवेश प्रक्रियेच्या काळात या महाविद्यालयांना मोठा फटका बसला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनेही या निर्णयाला मंजु...
दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद अमरावतीत उमटले. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोटांगण आंदोलन करत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. बुधवारी झालेल्या या आंदोलनादरम्यान...
अमरावती येथील कठोरा रोडवर एका शाळेजवळ बुधवारी दुपारी एका अज्ञात तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच झाला असावा. ही घटना हत्या आहे की आत्महत्या, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृतदेहाची अद्याप...
अमरावती येथील लक्ष्मीनगर परिसरात आज, बुधवारी सकाळी पावसाच्या पुराच्या पाण्यात पाच महिन्यांच्या बालकाचा मृतदेह वाहून आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. पो...
नांदगाव पेठ येथील पंचतारांकित एमआयडीसीमधील श्याम इंडोफॅब प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामातून ३७ लाख रुपयांची औद्योगिक यंत्रसामग्री चोरीला गेली आहे. गेल्या चार वर्षांपासून ही कंपनी बंद होती. मंगळवारी सायंकाळी गोदामाच्या पाहणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नांदगावपेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांव...
पुणे शहरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील २६ मंडलांमधील ४८ केंद्रांवर एकूण ५,२४८ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. हा उपक्रम पुणे शहरातील सर्वात मोठ्या रक्तदान मोहि...
सामाजिक विषय अत्यंत प्रभावीपणे हाताळणारा ‘द इंडिया स्टोरी’ (The India Story) हा बहुचर्चित कोर्टरूम ड्रामा येत्या 24 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अन्नपदार्थांमध्ये होणारी जी...
पुण्यात काँग्रेस भवनसमोर भारतीय जनता युवा मोर्चाने आयोजित केलेले आंदोलन बुधवारी फज्जा ठरले. केवळ 30 ते 35 कार्यकर्ते उपस्थित होते आणि अवघ्या 10 ते 15 मिनिटांत घोषणाबाजी करून आंदोलन संपवण्यात आले. काँग्रेस देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ राह...
भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर महानगरच्या वतीने आज शहागंज येथील गांधी भवन परिसरात काँग्रेस पक्षाने पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली. या वेळी काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करत केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीला पाठिंबा व्यक्त करण्यात आला. या निषेध आंदोल...
सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून विरोधी पक्षातील आमदार व खासदारांना आपल्याकडे खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नुकतेच उद्धव ठाकरेंच्या सहा खासदारांनी त्यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याने, आता त्यांचे आमदारही पक्षाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात...
दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन, पोलिसांची कारवाई आणि विरोधी पक्षाच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे. “जंतर-मंतरवर घडलेल्या घटना टाळता आल्या असत्या. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर वेळेत तोडगा निघाला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नस...
भारत हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने विदर्भात आगामी २४ ते ४८ तासांत मुसळधार ते खूप मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागपूरसह चार जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात...
छत्रपती संभाजीनगर येथील औरंगपुरा परिसरातील सावित्रीबाई फुले भाजीमंडईचे अखेर 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोकार्पण झाले आहे. बुधवारी (22 जुलै) दुपारी 1 वाजता मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या नूतन भाजीमंडईचे उद्घाटन करण्यात आले. ही मंडई ‘बीओटी’ (बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा) तत्त्वावर उभारण...
भारतात मोबाईलद्वारे सर्वसामान्य नागरिकांची होणारी आर्थिक फसवणूक चिंतेचा विषय ठरत आहे. ‘बायोकॅच’ (BioCatch) या मानवी वर्तनाचे विश्लेषण करणाऱ्या कंपनीच्या नवीन अहवालानुसार, वर्ष 2025 च्या दुसऱ्या सहामाहीपासून ते वर्ष 2026 च्या पहिल्या सहामाहीदरम्यान डिजिटल बँकिंग क्षेत्रातील टेक्स्ट मेसेज (SMS...
‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आंदोलनाची धार आणखी तीव्र केली आहे. दिल्लीतील राहुल गांधी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मंगळवारी महाराष्ट्रातील नागपूर आणि पुणे येथे काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने . दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी...
गॅसटंचाईचे कारण पुढे करत शासनाने मार्च 2026 पासून नवीन घरगुती वापराच्या गॅसचे (एलपीजी) कनेक्शन देण्यावर अघोषित बंदी घातली. परिस्थिती पूर्वपदावर येऊनही ही बंदी कायम असल्याने, सर्वसामान्यांसह नोकरी-उद्योगासाठी शहरात आलेल्या स्थलांतरित नागरिक आणि कामगारांचे हाल होत आहेत. तब्बल 52 हजार नागरिक नवीन कनेक्शन घ...
देशात आणि राज्यात होणाऱ्या शिक्षण घोटाळ्या विरोधात व सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी कृती समितीच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर २१ जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. नीट व टीईटी पेपरफुटी प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी विद्यार्थी कृती समितीच...
खरीप २०२५ हंगामातील प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या प्रश्नावर देवगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू केलेले ‘सरण आंदोलन’ मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्तक्षेपानंतर मंगळवारी (दि. २१) तात्पुरते स्थगित करण्यात आले. मंत्री भुजबळ या . ^शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्यांबाब...