
महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी भाष्य केले आहे. तसेच बंडखोरीबाबत रवींद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सुनील तटकरे म्हणाले, महायुतीमधल्या इतर पक्षांनी अधिकृत उमेदवारांच्या संदर्भात अर्ज भरले असतील तर त्या संदर्भातली चर्चा रवींद्र चव्हाण यांच्यासोबत झाली. कोकण मतदारसंघात सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला ही जागा मिळत असतानाच जसे मी काल देवेंद्रजींचा उल्लेख केला, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा उल्लेख केला तसा चव्हाण साहेबांचे सुद्धा भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचाही त्यात सहकार्य लाभले होते. आज ही चर्चा, आजची भेट ही सदिच्छा भेट होतीच, त्याचसोबत या निवडणुका एकमताने सामोरे जात असताना त्यात सामंजस्य कसे करता येईल, याची चर्चा केली. जिथे बंडखोरी झाली तिथले अर्ज मागे घेतले जातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध महायुतीमधला घटक पक्ष अशी परिस्थिती दिसत आहे. तसेच अनेक ठिकाणी बंडखोरी देखील झाली. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, बऱ्यापाकी ठिकाणी अशीच स्थिती आहे. मला विश्वास आहे की ज्यावेळेला तीन नेतृत्व या संदर्भातला निर्णय करेल, जो झालाच आहे, त्या अर्थी देशातल्या केंद्रीय नेतृत्वाने या संदर्भातील अनुमती दिल्याच्या नंतर ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे अर्ज दाखल केले असतील तर ते अर्ज मागे घेण्याच्या दृष्टिकोनातून मार्ग निघेल. भरत गोगावलेंनी अनिकेतला फोन करून शुभेच्छा दिल्या आज भाजपच्या नेत्यांची भेट घेतली, तसेच आज अजून शिवसेनेतील कोणत्या नेत्यांना भेटणार आहात? या प्रश्नावर सुनील तटकरे म्हणाले, एकतर काल अर्ज भरायला आमदार उदय सामंत होते, दीपक केसरकर होते, आमदार महेंद्र थोरवे होते, आमदार भरत गोगावले सुद्धा येणार होते, पण त्यांचा वाढदिवस होता. त्यांनी सकाळीच अनिकेतला फोन करून शुभेच्छा दिल्या. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने आम्ही सर्वच मुंबईत आहोत, त्यामुळे आज आम्ही विविध मुद्यांवर चर्चा करणार आहोत. महायुतीचे उमेदवार निवडून येतील महेंद्र दळवी यांच्या मुलीचा अजूनही अर्ज आहे, यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आधी चर्चा झाली होती. जसे मी सांगितले उदय सामंत, दीपक केसरकर तसेच शिवसेनेचे इतर नेते अर्ज भरताना होते. तेवढ्यावरच सीमित न राहता महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असे तटकरे यांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
