अमरावती जिल्ह्यात सूर्यफूलाचे दिसणारे ताटवे आता दुर्मिळ: सोयाबीनच्या वाढत्या पेरणीमुळे घटले उत्पादन – Amravati News

अमरावती जिल्ह्यात सूर्यफूलाचे दिसणारे ताटवे आता दुर्मिळ:  सोयाबीनच्या वाढत्या पेरणीमुळे घटले उत्पादन – Amravati News



अमरावती जिल्ह्यात सूर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे, ज्यामुळे एकेकाळी शेतात दिसणारे सूर्यफुलाचे ताटवे आता दुर्मिळ झाले आहेत. सोयाबीनला वाढती मागणी मिळाल्याने शेतकऱ्यांनी सूर्यफुलाकडे दुर्लक्ष केले आहे. जुने जाणते शेतकरी सांगतात की, सूर्यफूल हे हलक्या आणि मध्यम प्रतीच्या जमिनीत घेतले जाणारे पीक होते. कमी पाणी, कमी खर्च आणि कमी कालावधीत हे पीक एकरी सात ते आठ क्विंटलचा उतारा देत असे. मात्र, सोयाबीनलाही कमी पाणी लागते आणि ते अत्यल्प पर्जन्यमान तसेच अतिवृष्टीतही तग धरते. यामुळे शेतकऱ्यांनी तेलबिया पीक म्हणून सोयाबीनला पसंती दिली आहे. पेरणीनंतर एक-दोन कोळपणीनंतर जोमाने वाढणाऱ्या सूर्यफुलाऐवजी आता सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्वी भुईमूग, ज्वारी यांसारख्या पिकांमध्ये सूर्यफुलाची लागवड केली जात असे, ज्यामुळे कुटुंबासाठी वर्षभराच्या खाद्यतेलाची सोय होत असे. सिंचन क्षेत्र वाढल्याने जिरायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले असून, याचा परिणाम कडधान्यांच्या आणि खाद्यतेलासाठी घेतल्या जाणाऱ्या सूर्यफुलाच्या उत्पादनावर झाला आहे. पूर्वी सेंद्रिय खतांवर पिके घेतली जात असताना सूर्यफुलाच्या ताटव्यांवर परागकण गोळा करण्यासाठी मधमाश्यांचा मोठा गोंगाट असे. बांधावरील झाडांवर मधमाश्यांची पोळीही आढळून येत असत. मात्र, रासायनिक विषारी औषधांच्या वापरामुळे आणि सूर्यफुलाची लागवड घटल्याने मधमाश्यांची संख्याही कमी झाली आहे, ज्यामुळे आता त्यांची पोळी दिसणेही दुर्मिळ झाले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp