digital products downloads

पटेल-तटकरे आमचेच नेते, पक्षात कोणतेही मतभेद नाहीत: दिल्ली कार्यालयात कोणालाही रोखले नाही, अविनाश आदिकांचे स्पष्टीकरण – Mumbai News

पटेल-तटकरे आमचेच नेते, पक्षात कोणतेही मतभेद नाहीत:  दिल्ली कार्यालयात कोणालाही रोखले नाही, अविनाश आदिकांचे स्पष्टीकरण – Mumbai News


सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत गेल्या काही दिवसांपासून सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चांना अखेर पक्षाने पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या, तसेच प्रफुल पटेल व सुनील त

.

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या ज्येष्ठ नेते सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांना साईडलाईन करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आज या दोन्ही नेत्यांच्या एका जवळच्या नेत्याला दिल्लीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात रोखून धरण्यात आल्याची घटना घडली आहे. या नेत्याला पक्षाविषयी गैरसमज न पसरवण्याची कथित तंबीही देण्यात आल्याचीही माहिती आहे. या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या चर्चांवर राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक आणि उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे

नेमके काय म्हणाले अविनाश आदिक?

पत्रकार परिषदेत बोलताना अविनाश आदिक म्हणाले, “मी पक्षाचा राष्ट्रीय सचिव असून दिल्लीतील कार्यालयाचे कामकाज पाहतो. गेल्या काही आठवड्यांच्या खंडानंतर मी कालच दिल्ली कार्यालयात गेलो होतो. मात्र, एका वृत्तपत्राने माझ्या नावाने अत्यंत चुकीची आणि खोडसाळ बातमी छापली. मी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना दिल्ली कार्यालयात येण्यास बंदी घातल्याचा दावा या बातमीत केला होता. हा सर्व प्रकार माझ्या आणि पक्षाच्या विरोधात जाणीवपूर्वक रचलेला कट आहे. आम्ही कायदेशीर सल्ला घेत असून संबंधित वृत्तपत्रावर लवकरच अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत.”

तटकरे-पटेल हेच आमचे नेते – उमेश पाटील

पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी देखील अंतर्गत वादाचे वृत्त फेटाळून लावले. “सुनील तटकरे हेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राहतील. तसेच प्रफुल पटेल हे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. पक्षाची नवी राष्ट्रीय कमिटी नुकतीच जाहीर झाली असून, आगामी काळातील सर्व संघटनात्मक निर्णय ही कमिटीच घेईल. त्यामुळे माध्यमांनी चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन त्यांनी केले.

उमेश पाटलांचा रोहित पवारांवर गंभीर आरोप

यावेळी उमेश पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आणि वैयक्तिक पातळीवर आरोप केले. “रोहित पवार हे राजकीय फायद्यासाठी अजित पवार यांच्या नावाचा वापर करत असून त्यांनीच दादांचा सर्वाधिक छळ केला आहे. बारामती ही अजितदादांची राजकीय राजधानी आहे, मात्र रोहित पवारांचा डोळा आता बारामतीवर आहे,” असा घणाघात पाटील यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, “अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून रोहित पवार केवळ राजकारण करत असून दादांची राजकीय ‘लीगसी’ (वारसा) हिरावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी आमच्या पक्षाची काळजी करू नये. शरद पवार गटातील अनेक आमदार आणि खासदार आजही अजितदादांच्या संपर्कात असून आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत, मात्र आम्ही अद्याप त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतलेला नाही,” असा खळबळजनक दावाही त्यांनी यावेळी केला.

हे ही वाचा…

राष्ट्रवादीत सुप्त संघर्ष सुरू झालाय का?:सुनेत्रा पवारांसाठी नाजूक काळ; सुनील तटकरे – प्रफुल्ल पटेल नाराज झालेत का? पुढे काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हालचाली पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कार्यकारिणीतून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना डावलल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंत्री अनिल पाटील यांनी हे वृत्त फेटाळले असले, तरी त्यानंतर घडलेल्या राजकीय भेटीगाठी व सूचक विधानांमुळे या चर्चेला अधिक धार मिळाली आहे. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial