digital products downloads

परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत इंधन वाचवा: मोदींवर जितकी टीका कराल, तितकेच खड्ड्यात जाल, देशहिताच्या निर्णयावर टीका करणे काँग्रेसची सवय- शिंदे – Mumbai News

परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत इंधन वाचवा:  मोदींवर जितकी टीका कराल, तितकेच खड्ड्यात जाल, देशहिताच्या निर्णयावर टीका करणे काँग्रेसची सवय- शिंदे – Mumbai News



सुरक्षेच्या दृष्टीने ज्या गाड्या गरजेच्या आहेत त्या आमच्या ताफ्यात आहेत. बाकी गाड्या आम्ही कमी केल्या आहेत. इंधंन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केले आहे, त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला पाहिजे. यामध्ये कोणीही राजकारण करू नये. आपल्यासाठी देश सर्वांत पहिले असला पाहिजे, असे शिंदेंनी म्हटले आहे. परिस्थिती पूर्ववत होत नाही तो पर्यंत आपण इंधंन बचत केली पाहिजे. गरज असेल तिथे प्रवास केला जाईल जिथे गरज नाही तिथे प्रवास होणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, राहुल गांधी यांच्याबद्दल मी काय बोलावे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या ज्यावेळी देशहिताचा निर्णय घेतात त्यावेळी त्यांच्यावर टीका करत असतात. काँग्रेसने 100 हून अधिक वेळा पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप केले आहेत. पण आता काँग्रेसची काय परिस्थिती आहे? हे जितके मोदी यांच्यावर टीका करतील जनता तितकीच त्यांना धडा शिकवेल, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे म्हटले आहे. म्हणून काँग्रेस खड्ड्यात जातंय एकनाथ शिंदे म्हणाले की, पश्चिम बंगाल आणि आसाम निवडणुकीच्या निकालाने जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे हे दाखवून दिले आहे. त्यामुळे काँग्रेस पीएम मोदींवर जितके आरोप करेल तितकेच ते खड्ड्यात जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानानंतर एकनाथ शिंदे हे ई कारने विधानभवनात दाखल झाले आहेत. सावे, राणेंचा मंत्रालयापर्यंत पायी प्रवास दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहानानंतर नीतेश राणे यांनी मंत्रालयापर्यंत पायी प्रवास केला. यावेळी बोलताना नीतेश राणे म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीसाठी मी पायी मंत्रालयात जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेपर्यंतचा प्रवास हा दुचाकीवर केला आहे. आम्ही आमच्या ताफ्यातील गाड्या कमी केल्या आहेत. म्हणून देशाच्या सर्वच लोकांनी काटकसर केली पाहिजे. यामध्ये कोणत्याही पक्षाने राजकारण करू नये. हा काही राजकारण करण्याचा विषय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून ते आवाहन केले आहे. प्रत्येक नागरिकाने ते पाहिले पाहिजे. सर्वांनी केवळ नागरिक म्हणून याकडे पाहिले पाहिजे. आमच्या ताफ्यात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दोन गाड्या ठेवाव्या लागतात. त्या ठेवाव्याच लागतात. मी EV वापरण्यास सुरूवात केली आहे. तर मंत्री अतुल सावे यांनी सुद्धा आपल्या शासकीय निवासस्थानापासून ते मंत्रालयापर्यंत पायीप्रवास केला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp