जालन्यात पर्जन्यमापक यंत्रांशी छेडछाड: बर्फ ठेवून पावसाच्या खोट्या नोंदी, शेतकऱ्यांमध्ये संताप; जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल – Jalna News

जालन्यात पर्जन्यमापक यंत्रांशी छेडछाड:  बर्फ ठेवून पावसाच्या खोट्या नोंदी, शेतकऱ्यांमध्ये संताप; जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल – Jalna News



जालन्यामध्ये हवामान व पर्जन्यमापनात एक अत्यंत धक्कादायक गैरप्रकार उघडकीस आला असून, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 49 पैकी तब्बल 40 स्वयंचलित हवामान केंद्रांमधील पर्जन्यमापक उपकरणांमध्ये तब्बल चार वेळा छेडछाड झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रत्यक्षात पाऊस पडलेला नसतानाही या यंत्रांवर चक्क बर्फाचे तुकडे ठेवून आणि उपकरणाच्या रिंग तोडून पावसाच्या खोट्या नोंदी दाखवण्याचा हा गंभीर प्रकार प्रशासनाच्या तपासात उघड झाला आहे. जालना जिल्ह्यात प्रत्यक्ष पाऊस पडलेला नसतानाही हवामान केंद्रांवर मोठ्या पावसाची नोंद होत असल्याने, संशयित शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून प्रशासनाने केलेल्या तपासात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञातांनी पर्जन्यमापक यंत्रांच्या रिंग तोडून त्यावर चक्क बर्फाचे तुकडे ठेवल्याचे आणि तो बर्फ वितळून पावसाची खोटी नोंद केल्याचे या तपासात स्पष्ट झाले आहे. हवामान अंदाजावरच शेतकऱ्यांच्या शेतीकामांची संपूर्ण दिशा अवलंबून असते. त्यामुळे या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या नोंदींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. असा प्रकार घडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल- जिल्हाधिकारी या गंभीर गैरप्रकाराची अत्यंत तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यातील एकूण 49 हवामान केंद्रांपैकी तब्बल 40 ठिकाणी जवळपास चार वेळा उपकरणांशी छेडछाड झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हवामान केंद्रांतील या पर्जन्यमापकांच्या नोंदींवरच शेतीचे आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजन अवलंबून असते. त्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या या प्रकाराची प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली असून, यापुढे असा प्रकार घडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. पोलिस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद या धक्कादायक प्रकारानंतर जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासनासोबत तातडीची बैठक घेत धडक पावले उचलली आहेत. या बैठकीत संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, आतापर्यंत पाच पोलिस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्ह्यांची नोंदही करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, भविष्यात अशा प्रकारच्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी आणि हवामान केंद्रांच्या सुरक्षेसाठी आता सर्वच केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »