शेतकऱ्यांना विनाअट सरसकट‎कर्जमाफी द्या; अन्यथा आंदोलन‎: अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; शेतकरी विकास मंचचे धरणे‎ – Akola News

शेतकऱ्यांना विनाअट सरसकट‎कर्जमाफी द्या; अन्यथा आंदोलन‎:  अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; शेतकरी विकास मंचचे धरणे‎ – Akola News



शेतकऱ्यांना कोणत्याही अटी व‎शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्यात‎यावी. या प्रमुख मागणीसाठी शेतकरी‎विकास मंचातर्फे रविवारी जिल्हाधिकारी ‎‎कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात ‎‎आले. ही मागणी मान्य न झाल्यास ‎‎सामूहिकपणे आंदोलन छेडण्यात येईल.‎असा इशाराही देण्यात आला.‎ शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन ‎‎केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎यांनी जून २०२६ मध्ये शेतकरी कर्जमाफी ‎‎करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी ‎‎उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य‎सरकारने //”मित्र” संस्थेचे मुख्य कार्यकारी ‎‎अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्टोबर ‎‎२०२५ मध्ये समिती गठित केली. शेती‎कर्जाची माहिती शासनाच्या पोर्टलवर ‎‎भरण्याची प्रक्रिया राबवण्यात आली.‎त्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पात‎कर्जमाफीची घोषणा करण्यात आली‎ होती. २ जून रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या ‎‎बैठकीत कर्जमाफी योजनेला मंजुरी‎देण्यात आली. त्यानंतर पात्र-अपात्र ‎‎तपासणीची मोहीम सुरू झाली. दरम्यान,‎२१ जून रोजी शेतकरी विकास मंचचे‎अध्यक्ष हुसेन खान यांच्या पुढाकारात‎धरणे आंदोलन करण्यात आले.‎आंदोलनात बहुसंख्य शेतकरी, शेतकरी‎संघटनांचे पदाधिकारी, कृषी क्षेत्राशी‎संबंधित नागरिक सहभागी झाले होते. यात‎शेतकरी जागर मंचाचे संयोजक तथा कृषी‎अर्थतज्ज्ञ प्रशांत गावंडे, अक्षय राऊत,‎भास्कर डोंगरे, सुगत भटकर, अब्दुल‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎मन्नान, अमान इनामदार, जुबेर इनामदार,‎अब्दुल्ला खान, लियाकत अली खान,‎मोहम्मद अफजल, मतीन अहमद,‎रूपराव बागडे समवेत कास्तकार, कृषी‎संघटना, शेतकरी विकास मंच महाराष्ट्रचे‎पदाधिकारी, कास्तकार मोठ्या संख्येने‎उपस्थित होते.‎
‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎अटींचा २० हजारांवर शेतकऱ्यांना‎बसणार फटका : कर्जमाफी योजनेनुसार‎३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या‎शेतकऱ्यांची संख्या, अन्य माहिती‎शासनस्तरावरून मागवण्यात आली होती.‎त्यानुसार प्राथमिकतः अकोला- वाशीम‎जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ५० हजार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎४०४ खातेदारांकडे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत‎अंदाजे ६४१ कोटी थकले होते. मात्र शासन‎आदेश जारी झाल्यानंतर नेमका‎कालावधी समोर आला. त्यानुसार १‎एप्रिल २०१९ ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक‎कर्ज थकीत असलेले शेतकरी पात्र‎आहेत. ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्ज फेडू न‎शकलेले शेतकरीही पात्र आहेत. यापूर्वी‎झालेल्या कर्जमाफी योजनेत लाभ‎घेतलेला शेतकरी पात्र ठरेल. तरीही पुन्हा‎कर्ज थकले असल्यास ५० हजारांपर्यंतचे‎कर्ज माफ होईल. मात्र सध्या झालेल्या‎तपासणीनुसार आकडेवारी कायम‎राहिल्यास अटी, निकष, कालावधीचा‎फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता‎आहे. विनाअट कर्जमुक्ती आवश्यक‎असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.‎ आंदोलनादरम्यान सरकारच्या धोरणांवर केली टीका‎ सरकारची कृषी व कास्तकार संदर्भातील‎तकलादू धोरणांवर आंदोलनात टीका‎करण्यात आली. सततची नैसर्गिक‎आपत्ती, उत्पादन खर्चातील वाढ,‎शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव,‎वाढते कर्जबाजारीपण यामुळे शेतकरी‎आर्थिक संकटात सापडला आहे.‎त्यामुळे सरकारने कोणत्याही प्रकारचे‎निकष न लावता सर्व शेतकऱ्यांना‎सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. बिना‎अट, बिना शर्त सरसकट कर्जमाफी‎द्यावी. अशा मागण्या यावेळी करण्यात‎आल्या. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर‎शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी‎एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार‎व्यक्त करण्यात आला.‎

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp