digital products downloads

मुख्यमंत्री फडणवीस: भारत ‘विश्वगुरू’ बनेल: आध्यात्मिक महासत्ता होण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनातून – Pune News

मुख्यमंत्री फडणवीस: भारत ‘विश्वगुरू’ बनेल:  आध्यात्मिक महासत्ता होण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनातून – Pune News



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्याचे स्वप्न केवळ आर्थिक किंवा लष्करी सामर्थ्यावर आधारित नाही, तर ते आपल्या समृद्ध आध्यात्मिक वारशात रुजलेले आहे. भारताला आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखालीच प्रशस्त होत आहे, असे गौरवपूर्ण उद्गार त्यांनी काढले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंगळुरू येथील ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर’ला भेट दिली, त्यावेळी ते जनसमुदायाला संबोधित करत होते. ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेच्या मानवतेच्या ४५ वर्षांच्या सेवेनिमित्त आणि गुरुदेवांनी वयाची ७० वर्षे पूर्ण केल्याबद्दल आयोजित महिनाभर चालणाऱ्या उत्सवाचा हा भाग होता. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, गुरुदेव हे संपूर्ण जगासाठी भारताचे सर्वात मोठे आध्यात्मिक दूत आहेत. त्यांनी भारताची महान तत्त्वे, वैश्विक ज्ञान आणि शहाणपण जगासमोर अशा प्रभावीपणे मांडले आहे की, आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वेधले गेले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून लाखो लोकांना त्यांच्या जीवनाचा अंतिम उद्देश सापडत आहे, हाच गुरुदेवांच्या कार्याचा खरा विजय आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात आर्ट ऑफ लिव्हिंगने केलेल्या सामाजिक कार्याचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, “गेल्या १०-१२ वर्षांपासून मी स्वतः या संस्थेच्या कामाचा साक्षीदार आहे. महाराष्ट्रातील जलसंधारणाच्या क्षेत्रात आर्ट ऑफ लिव्हिंगने केलेले कार्य अभूतपूर्व असून, त्याने लाखो लोकांचे जीवन बदलले आहे. तसेच, नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्यांना नवी उमेद देऊन त्यांना स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार बनवण्याचे कार्य गुरुदेवांच्या प्रेरणेने झाले आहे.” या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि उत्तराखंडचे राज्यपाल अजय कुमार भल्ला प्रामुख्याने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या भव्य ‘ध्यान मंदिरा’त सर्व मान्यवरांनी विशेष सत्संगाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला खासदार संजय जाधव, आमदार अमित साटम, मंत्री जयकुमार रावल आणि इतर उद्योजक व मान्यवर उपस्थित होते. या भेटीदरम्यान मान्यवरांनी आश्रमातील ‘श्री श्री गोशाळे’लाही भेट दिली, जिथे १९ दुर्मिळ प्रजातींच्या १६०० हून अधिक देशी गायींचे संगोपन केले जाते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp