
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. “अजित दादांचे अर्थखाते आता मुख्यमंत्री चांगले सांभाळत आहेत,” या संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेताना, “खातेवाटपाबाबत काय राऊतांशी बोलून निर्णय घ्यायचे का?” असा खोचक टोला भुजबळांनी लगावला. तसेच, राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याबाबत पक्षीय पातळीवर काय घडामोडी झाल्या, यावरही त्यांनी जाहीर भाष्य केले. “खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा” संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले, “संजय राऊत सांगतील आणि त्याप्रमाणे खातेवाटप होईल असे कसे होईल? खातेवाटपाबाबत आता काय राऊतांशी बोलावे लागेल का? राज्यातील खातेवाटपाबाबत जे काही निर्णय आहेत, ते सर्वस्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मिळून घेतलेले आहेत. त्यामुळे त्यात इतरांनी ढवळाढवळ करण्याची गरज नाही.” राज्यसभा उमेदवारी आणि ‘समीर भुजबळांच्या’ मंत्रिपदाचा प्रस्ताव! या पत्रकार परिषदेत भुजबळ यांनी राज्यसभेच्या उमेदवारीबाबत पडद्यामागे काय घडले, याचा खुलासा केला. “मी स्वतः राज्यसभेवर जाणार होतो. मात्र, मी जात असताना इतर मुलांना (तरुण नेत्यांना) देखील संधी मिळाली पाहिजे, हा विचार पुढे आला. त्यामुळे मी पक्षाकडे प्रस्ताव ठेवला होता की, माझ्या मुलांनाही संधी द्या; इथे समीर भुजबळ यांना राज्य सरकारमध्ये मंत्रीपद द्या आणि मी दोन वर्षांसाठी राज्यसभेवर जातो. परंतु, शेवटी पक्षाने जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे,” असे भुजबळ म्हणाले. पक्षाने घेतलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे. “ज्यांना संधी मिळाली ते आता गेले आहेत, पक्षाचा निर्णय अंतिम असतो,” असे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. “ज्या पक्षासाठी पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून…” आपल्या राजकीय प्रवासाची आठवण करून देताना भुजबळ भावूक झाले. “ज्या पक्षासाठी मी शरद पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केले, तिथे नेहमीच पक्षाच्या हिताला प्राधान्य दिले,” असे म्हणत त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. जैन यांच्या निवडीनंतर आपल्या मनात कोणतीही कटुता नसल्याचे सांगत त्यांनी पुढील पक्षीय कार्यास शुभेच्छा दिल्या. माझ्यावरील टीका योग्यच!:वादग्रस्त कॉमेडियन प्रणीत मोरेचा जाहीर माफीनामा, म्हणाला- ‘एक संधी द्या, स्वतःला बदलून दाखवेन’ ‘370 रुपयांची बिर्याणी’ वादामुळे प्रचंड टीकेचा सामना करणारा स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे अखेर समोर आला असून त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत जाहीर माफी मागितली आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या तरुणाला वेळेवर रोखता आले असते, मात्र तसे करण्यात आपण अपयशी ठरलो, अशी कबुली देत त्याने ही चूक आपलीच असल्याचे मान्य केले आहे. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
