उद्धव ठाकरेंनी बोलावली खासदारांची बैठक: 14 जून रोजी ‘मातोश्री’वर ठरणार पुढील रणनीती, ‘ऑपरेशन टायगर’मुळे ठाकरेंची सावध भूमिका – Mumbai News

उद्धव ठाकरेंनी बोलावली खासदारांची बैठक:  14 जून रोजी ‘मातोश्री’वर ठरणार पुढील रणनीती, ‘ऑपरेशन टायगर’मुळे ठाकरेंची सावध भूमिका – Mumbai News



राज्याच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा रंगली असतानाच, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक 14 जून रोजी वांद्रे येथील मातोश्री या निवासस्थानी पार पडणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा काही मोठ्या घडामोडी घडणार आहेत का, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार गळाला लावण्याच्या अनुषंगाने ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात असल्याची राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चा सुरू आहे. याच शक्यतेच्या पार्श्वभूमीवर, आपल्या खासदारांना एकत्र ठेवण्यासाठी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या जोरदार चर्चा सध्या सुरू असून, याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून परभणी जिल्हा संघटनेत काही महत्त्वपूर्ण बदलही करण्यात आले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून खासदार जाधव हे पक्षाच्या बैठकांनाही गैरहजर राहत असल्याने या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आता येत्या 14 तारखेला होणाऱ्या शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीला संजय जाधव उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्याच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून, शिवसेना शिंदे गटातील नेत्यांकडून वेळोवेळी असे दावे केले जात आहेत की, ठाकरे गटाचे अनेक खासदार लवकरच त्यांच्या पक्षात प्रवेश करतील. काही दिवसांपूर्वी तर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीला ठाकरेंच्या 9 पैकी तब्बल 7 खासदार उपस्थित असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला होता. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात असल्याची आणि फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. खासदारांच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण या चर्चांना बळ देणाऱ्या काही महत्त्वपूर्ण भेटीगाठीही अलीकडच्या काळात पाहायला मिळाल्या आहेत. ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची, तर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या सर्व भेटी केवळ मतदारसंघातील विकासकामे आणि निधीच्या संदर्भात असल्याचा दावा संबंधित नेत्यांकडून केला जात असला तरी, यामागे मोठी राजकीय रणनीती शिजत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरेंची सावध भूमिका या सर्व राजकीय घडामोडी आणि दाव्यांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून अतिशय सावध पावले उचलली जात आहेत. आपल्या खासदारांना एकत्र ठेवण्यासाठी आणि त्यांच्यातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी 14 जून रोजी सर्व खासदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते स्वतः खासदारांना मार्गदर्शन करून पुढील रणनीती ठरवणार आहेत. त्यामुळे या बैठकीनंतर राज्याच्या राजकारणात नेमकी कोणती नवी आणि मोठी घडामोड पाहायला मिळणार, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp